अहमदाबाद विमान एवढा गंभीर आहे की त्यामुळे संपूर्ण देशच नाही तर जग सुन्न झाले आहे. B – 787 ड्रीम लाइनर सारखे अत्याधुनिक आणि सुरक्षित विमान एवढ्या सहजपणे अपघातग्रस्त कसे होऊ शकते??, याविषयी अनेकांना तांत्रिक शंका आहेत. त्या रास्त देखील आहेत. पण ज्यांना रास्त शंका आल्यात त्यांनी त्या अतिशय संयमाने व्यक्त केल्यात कॅप्टन एहसान खालिद आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन राजीव प्रताप रुडी ही त्याची उदाहरणे ठरली. या दोघांनी अतिशय संयमाने विमानाच्या उड्डाणाच्या तांत्रिक बाजू समजावून सांगितल्या. पण तरी देखील चौकशी आणि तपास यांचा अंतिम अहवाल येईपर्यंत कुठलाही निष्कर्ष काढणे धोकादायक आहे, असा गंभीर इशाराही देऊन ठेवला.
विमानाचे उड्डाण होऊन ते 600 फूट हवेत गेल्यानंतर देखील विमानाचा लँडिंग गिअर डाऊन कसा??, असा गंभीर सवाल कॅप्टन एहसान खालिद यांनी उपस्थित केला. पण तो करताना त्यांनी कुठले गांभीर्य सोडले नाही किंवा संशयाची पेरणी केली नाही. त्यांनी अनेक तांत्रिक बाबी सर्वसामान्यांच्या लक्षात येतील अशा भाषेत सांगितल्या.
भारतातल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील गांभीर्याने आणि संयमाने प्रतिसाद नोंदविला. तरी देखील सोशल मीडियातील काही उडाणटप्पूंनी संशयाच्या भूतांचे हवेत पतंग उडवल्याशिवाय सोडले नाहीत. ध्रुव राठी हे त्याचे उदाहरण ठरले.
ध्रुव राठीचा आगाऊपणा
B – 787 ड्रीम लाइनर सारख्या सर्वात अत्याधुनिक आणि सुरक्षित मानल्या गेलेल्या विमानाचा अपघात होऊच कसा शकतो??, अशा संशयाची पाल ध्रुव राठीने सोशल मीडियावर सोडून दिली. ती सगळीकडे फिरली आणि तिने विमान अपघाताचे गांभीर्य घालविले. अनेकांच्या मनात संशयाचे भूत पेरले. हा विमान अपघात नसून घातपात आहे मग तो मोदींच्या राजवटीत घडलाच कसा??, सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याच कशा?? त्या कुणी आणि कशासाठी ठेवल्या??, अशा एकापाठोपाठ एक सवालांच्या फैरी अनेकांनी झाडल्या. या सवालांना कुठलेही उत्तर देण्याच्या फंदात मोदी सरकार किंवा गुजरात सरकार पडले नाही. तसे पडण्याचे कारणही नव्हते. कारण विमान अपघात ही बाब उथळ चर्चा करण्याची नसून संशयाच्या भूतांची पेरणी करण्याची तर अजिबात नाही याचे भान दोन्ही सरकारांनी राखले. त्यामुळेच केंद्र सरकार अथवा राज्य सरकार अपघात किंवा घातपात शब्दांच्या फेऱ्यात न अडकता प्रत्यक्ष बचाव आणि मदत कार्य यावरच लक्ष केंद्रित केले हे फार महत्त्वाचे ठरले.
अहमदाबाद विमान अपघातातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर यांच्या तपासानंतर विशिष्ट सत्य बाहेर येईलच मग तो अपघात आहे की घातपात याविषयी देखील संशय दूर होईल, पण त्याविषयी आत्ताच चर्चा करण्याची किंवा त्याविषयी संशयाचे भूत पेरण्याची ही वेळ नाही. संबंधित विमानाचा अपघात असेल, तर त्याविषयी विशिष्ट उपाययोजना करता येतील आणि विमानाचा घातपात असेल, तर त्याविषयी देखील अधिक गांभीर्याने लक्ष घालून अधिक गंभीर उपाय योजना करता येतील. या सर्व नंतरच्या बाबी झाल्या. त्याआधी विमानाच्या अपघाताचे गांभीर्य ओळखून संयमाने प्रतिसाद देणे प्रतिक्रिया व्यक्त करणे किंवा प्रत्यक्ष मदत कार्य करणे एवढेच काम यंत्रणांच्या आणि नागरिकांच्या हातात आहे, ते त्यांनी पार पाडले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App