
युनेस्कोचा दर्जा मिळावा यासाठी बराच काळ प्रयत्न सुरू होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे घर असलेले शांती निकेतन आता जागतिक वारसा बनले आहे. रविवारी युनेस्कोने शांती निकेतनचा जागतिक वारसा यादीत समावेश केल्याचे जाहीर केले. टागोरांचे घर शांती निकेतन पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात आहे. या सांस्कृतिक स्थळाला युनेस्कोचा दर्जा मिळावा यासाठी बराच काळ प्रयत्न सुरू होता. Rabindranath Tagores Shanti Niketan has been included in the UNESCO World Heritage List
रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी 1863 मध्ये बीरभूम जिल्ह्यात शांती निकेतनची निर्मिती केली. हे कोलकाता पासून 100 किमी अंतरावर उत्तरेकडे वसलेले आहे. तथापि, नंतर रवींद्रनाथ टागोरांनी विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केल्यावर हे प्रसिद्ध झाले. शांती निकेतन ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेली अनोखी संस्था आहे. सुरुवातीला ही निवासी शाळा होती. टागोरांनी येथे राहून आपल्या उत्कृष्ट कलाकृती लिहिल्या.
सुरुवातीला शांतीनिकेतन सात एकर जागेवर पसरले होते. आता त्याचा विस्तार झाला आहे. रवींद्रनाथांनी 1901 मध्ये केवळ पाच मुलांसह विश्व भारती शाळा उघडली. पाच मुलांमध्ये त्यांचा मुलगाही होता. विद्यापीठाला 1921 मध्ये राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला. सध्या येथे सहा हजारांहून अधिक मुले शिक्षण घेतात.
BREAKING!
New inscription on the @UNESCO #WorldHeritage List: Santiniketan, #India
. Congratulations!
![]()
https://t.co/69Xvi4BtYv #45WHC pic.twitter.com/6RAVmNGXXq
— UNESCO
#Education #Sciences #Culture
(@UNESCO) September 17, 2023
देशातील अनेक वास्तूंना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. यामध्ये ताजमहाल, दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला, खजुराहोची प्राचीन मंदिरे, कुतुबमिनार यांचा समावेश आहे.
Rabindranath Tagores Shanti Niketan has been included in the UNESCO World Heritage List
महत्वाच्या बातम्या
- अमृता देशमुख चा होणाऱ्या नवऱ्यासाठी खास उखाणा! समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल
- ”जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी आहे, ते कधीच…” अमित शाह यांचे विधान!
- बहुजनांनी तुम्हा उच्चवर्णीयांसाठी फक्त बलिदानच द्यायचे का??; सुजात आंबेडकरांनी रोहित पवारांना फटकारले
- लष्कराने घेतला हौतात्म्याचा बदला, बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; अनंतनागमध्येही कारवाई सुरूच