
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे भारत अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी औषधे, रसद यांसारख्या गोष्टी पाठवत आहे, तर दुसरीकडे तिथले तालिबान सरकार भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानने आपल्या एका सैन्य तुकडीचे नाव ‘पानिपत’ ठेवल्याचे समोर आले आहे. भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पानिपत ऑपरेशनल युनिट अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील प्रांत नांगरहारमध्ये तैनात केले जाईल. Panipat, the name of the Taliban’s military unit Attempt to provoke India
किंबहुना, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता, अमेरिकन सैन्य तिथून माघार घेत असताना हे सर्व घडले. तेव्हापासून तिथे तालिबानची सत्ता आहे. ते सरकार मनमानी निर्णय घेत आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही देशाने तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही.
सैन्य तुकडीचे नाव पानिपत का ठेवले?
1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. या युद्धात अफगाण शासक अहमद शाह दुर्रानी याने मराठ्यांचा पराभव केला. त्यामुळेच या ऐतिहासिक घटनेवर अफगाणिस्तान राजकारण करून भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे.
अफगाणिस्तानच्या अमेज न्यूजने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पानिपत ऑपरेशनल युनिट’ देशाच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतात तैनात केले जाईल. हा प्रांत पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. ट्विटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक सैनिक गणवेशात दिसत आहे. सैनिकांच्या हातात अमेरिकन रायफल आहे.
दुर्राणीची कहाणी मशिदींमध्ये सांगितली जाते
तालिबान्यांकडून अफगाणिस्तानातील लोकांच्या मनात भारताविरुद्ध द्वेष निर्माण केला जातो. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार मुस्लिमांना पाठिंबा देण्यासाठी अहमद शाह दुर्रानी यांच्या कथा लोकांना सांगते असे काही अहवाल समोर आले आहेत. या लोकांना मशिदींमध्ये पानिपताच्या युद्धाबद्दल सांगितले जाते. पानिपतची कथा काश्मीरपासून पॅलेस्टाईनपर्यंत प्रसिद्ध होती असे म्हणतात.
Panipat, the name of the Taliban’s military unit Attempt to provoke India
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब विधानसभेच्या तोंडावर कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सोडला पक्ष, नेतृत्व प्रेरणादायी नसल्याचा केला आरोप
- भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तानात आश्रय, भारताने संयुक्त राष्ट्रसंघात वाचला पाकिस्तानच्या कृत्यांचा पाढा
- मदतीचे हात पुढे करूनही तालीबान्यांचे शेपुट वाकडेच, भारताला चिथावण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे नाव ठेवले पानिपत
- काश्मीरच्या मुद्यावरून भारत- पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युध्दाची शक्यता, इम्रान खान यांच्या वक्तव्याने तणाव
Array