विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीने बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. आरसीबीने एम चिन्नास्वामी स्टेडियममधील चेंगराचेंगरी प्रकरणात त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला रद्द करण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. Karnataka High Court
या चेंगराचेंगरी प्रकरणात ११ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिकजण जखमी झालेले आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर आरसीबीचा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूमधील एक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सवाचे आयोजन करणारी कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडनेही त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देणारी वेगळी याचिका दाखल केली आहे.
आरसीबीचे मालक रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेड (आरसीएसएल) यांनी असा युक्तिवाद केला आहे की त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. याचिकेनुसार, आरसीएसएलने असा दावा केला आहे की त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टपणे सांगितले होते की मर्यादित पास उपलब्ध आहेत.
तसेच मोफत पाससह प्रवेशासाठी देखील पूर्व-नोंदणी अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. स्टेडियमचे दरवाजे, जे दुपारी १.४५ वाजता उघडायचे होते, ते प्रत्यक्षात दुपारी ३ वाजता उघडण्यात आले, ज्यामुळे गर्दी वाढली, असा आरोप त्यांनी केला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, गर्दी व्यवस्थापनात पोलिसांच्या अपयशामुळे ही घटना घडली. आज उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App