विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक पुस्तिकेचा (एनआरसी) हिंदू-मुस्लिम फुटीशी काहीच संबंध नाही. काहीजण या दोन गोष्टींचा जातीय भावनेतून राजकीय फायद्यासाठी गैरवापर करत आहेत, असा आरोप रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही त्यांनी केला. Mohan Bhagwat targets on CAA
ते म्हणाले,की स्वातंत्र्यानंतर, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन केले होते. आत्तापर्यंत अल्पसंख्याकांची पुरेशी काळजी घेण्यात आली असून यापुढेही ते सुरू राहील. सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही. हा नागरिकत्व कायदा शेजारील देशांतील छळ केलेल्या अल्पसंख्यांकांनाही सुरक्षा प्रदान करेल. सर्व देशांना आपल्या नागरिकांबद्दल जाणून घेण्याचा हक्क आहे. सरकारचा यात सहभाग असल्याचे ही बाब राजकीय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App