
JP Nadda : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांनी ट्विट करून दावा केला आहे की, जेव्हा पीएम मोदींचा ताफा अडकला होता, तेव्हा सीएम चन्नी यांनी साधा फोनही घेतला नाही. त्यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला. JP Nadda Says PM’s convoy was stuck, but CM Channy did not even pick up the phone, Punjab police also instructed not to cooperate
वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांनी ट्विट करून दावा केला आहे की, जेव्हा पीएम मोदींचा ताफा अडकला होता, तेव्हा सीएम चन्नी यांनी साधा फोनही घेतला नाही. त्यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला.
पंजाब की कांग्रेस सरकार ने आगामी विधान सभा चुनाव में जनता के हाथों करारी हार के डर से पंजाब में देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के कार्यक्रमों को विफल करने के लिए हर संभव कोशिश की।प्रधानमंत्री की सुरक्षा से खिलवाड़ किया गया।
— Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) (@JPNadda) January 5, 2022
पंजाबचे काँग्रेस सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात
नड्डा यांनी एकापाठोपाठ अनेक ट्विट केले. त्यांनी लिहिले की, पंजाबमधील आगामी निवडणुकीत मतदारांच्या हातून दारुण पराभवाच्या भीतीने काँग्रेस सरकारने पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. हे करत असताना पीएम मोदींना भगतसिंग आणि इतर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहायची आणि विकासकामांची पायाभरणी करायची होती, याचीही जाण त्यांनी ठेवली नाही.
पंजाब की कांग्रेस सरकार ने ऐसा करने में इस बात की भी परवाह नहीं की कि देश के प्रधानमंत्री @narendramodi जी को देश के महान सपूत सरदार भगत सिंह और अन्य शहीदों को श्रद्धांजलि देनी थी और राज्य में प्रमुख विकास कार्यों की आधारशिला रखनी थी।
— Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) (@JPNadda) January 5, 2022
नड्डा पुढे म्हणाले की, पंजाबच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या घृणास्पद कारवाया करून दाखवून दिले आहे की, ते विकासविरोधी आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही आदर नाही.
अपनी निकृष्ट सोच और ओछी हरकतों से पंजाब की कांग्रेस सरकार ने दिखा दिया है कि वह विकास विरोधी है और हमारे स्वतंत्रता सेनानियों के लिए भी उनके दिल में कोई सम्मान नहीं है। यह घटना माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी की सुरक्षा में एक बहुत बड़ी चूक थी। यह बेहद चिंताजनक है।
— Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) (@JPNadda) January 5, 2022
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत सर्वात मोठी चूक
भाजप अध्यक्षांनी पुढे लिहिले की, सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही घटना पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक होती. पंजाबचे प्रधान सचिव आणि डीजीपी यांना एसपीजीला सांगण्यात आले की, पीएम मोदींचा मार्ग मोकळा आहे, तरीही आंदोलकांना तेथे जाण्याची परवानगी देण्यात आली. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सीएम चन्नी यांनी फोन तर घेतलाच नाही, समस्याही सोडवण्यास नकार दिला. पंजाबच्या काँग्रेस सरकारने वापरलेली ही रणनीती लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला खटकणारी आहे.
यह दुःखद है कि पंजाब के लिए हजारों करोड़ की विकास परियोजनाओं को शुरू करने के लिए आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी का दौरा बाधित हो गया। लेकिन, हम ऐसी घटिया मानसिकता को पंजाब की तरक्की में बाधक नहीं बनने देंगे और पंजाब के विकास के लिए प्रयास जारी रखेंगे।
— Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) (@JPNadda) January 5, 2022
पंजाब पोलिसांवरहीआरोप
नड्डा यांनी पंजाब पोलिसांवर आरोप करत म्हटले की, “पंजाब पोलिसांना रॅलीत जाणाऱ्यांना थांबवण्याची सूचना देण्यात आली होती. रॅलीला जाण्यासाठी पोलीस आंदोलकांशी संगनमत करत असल्याने मोठ्या संख्येने बसेस थांबवण्यात आल्या. सभेत सहभागी होणाऱ्या लोकांवर कठोरपणे अडवण्यात आले.”
JP Nadda Says PM’s convoy was stuck, but CM Channy did not even pick up the phone, Punjab police also instructed not to cooperate
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या सुरक्षेशी गंभीर खेळ : विमानतळावर अधिकाऱ्यांना मोदी म्हणाले, पंजाब सीएमना धन्यवाद सांगा, की मी जिवंत परतलो!!
- The focus india exclusive : अतिउच्चपदस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या उल्लंघनाचा बंगाल आणि पंजाब पॅटर्न!!
- आनंदाची बातमी : कोरोना बरा करणारी गोळी आली, 5 दिवसांचा कोर्स; किंमत किती आणि कुठून कराल खरेदी? वाचा सविस्तर
- खाबूगिरी : महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाच्या सहसंचालकांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ओबीसींच्या संतापावर आव्हाडांचे “…अन्यथा जय भीम”ने उत्तर; त्यांना नेमके सुचवायचेय काय…??