वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Indus water भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही तोंडघशी पडल्यानंतर एकीकडे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा अब्बास युद्ध पुकारण्याच्या धमक्या देत आहेत. दुसरीकडे, युद्धाचा मनसुबा बाळगून असलेले आर्मी चीफ असीम मुनीर यांनी आतल्या आत कट रचायला सुरुवात केली आहे. एलओसीवर (नियंत्रण रेषा) पाक लष्कराच्या ८ ब्रिगेडने ३५ अँटी ड्रोन युनिट तैनात केले आहेत. लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई हल्ले रोखण्याचे काम करतील.Indus water
पाकने एआय फेन्सिंगही केले आहे. याअंतर्गत टार्गेटिंग आणि सर्व्हिलन्स वेगवान करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर ड्रोन ग्रिडही तयार केले आहे. पाकने अफगाणिस्तानला लागून असलेल्या आपल्या सीमेवरून ५ बटालियन या महिन्याच्या सुरुवातीला हलवून एलओसीच्या रावलाकोट, कोटलीमध्ये तैनात केल्या आहेत.
Indus water; Pakistan deployed 35 drone units on LoC, installed AI fencing, Munir plots war
महत्वाच्या बातम्या
- UAE : UAE, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करू शकते; एअर डिफेन्स सिस्टिम आकाशतीरवरही चर्चा सुरू
- Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष
- पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??
- ममता बॅनर्जींना बंडखोरांचा मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून डच्चू!!