• Download App
    Pakistan आता पाकिस्तान पाण्यासाठी तळमळणार!

    Pakistan : आता पाकिस्तान पाण्यासाठी तळमळणार! भारताने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

    Pakistan

    भारत सरकारने पाकिस्तानला नोटीसही पाठवली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत सरकारने सिंधू जल (sindus Water Treaty  ) करारात बदल करण्याची मागणी केली आहे. भारत सरकारने यासंदर्भात पाकिस्तानला नोटीसही पाठवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता सिंधू जल करार कायम राखणे शक्य नाही. भारतानेही या सिंधू जल करारात बदल करण्याबाबत बोलले आहे.



    भारत सरकारशी संबंधित उच्च सूत्रांनी पाकिस्तानला पाठवलेल्या नोटीसची माहिती दिली आहे. हा करार 1960 पासून सुरू असून आता त्यातील विविध कलमांचे वास्तववादी मूल्यमापन केले पाहिजे, असे भारताने स्पष्टपणे सांगितले असल्याचे सांगण्यात आले. भारताने 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला या कराराशी संबंधित नोटीस पाठवली होती.

    भारताने नोटीसमध्ये काय केली मागणी?

    नोटीसमध्ये लिहिले आहे की, सिंधू नदीच्या पाण्याचा वापर आणि लोकसंख्या बदलत आहे, भारत स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत आहे आणि करारातील बदलांचा विचार करणे आवश्यक आहे. भारतानेही दहशतवादाचा उल्लेख करत पाकिस्तानला फटकारले. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान सातत्याने आमच्या औदार्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.

    Government of India sent notice to Pakistan to amend Indus Water Treaty

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलरच्या डोक्यातून आली कॉकरोच जनता पार्टी; पण भ्रम आणि वास्तव!!

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले