आसाममध्ये पुराचा कहर, 24 लाखांहून अधिक लोक बाधित, अनेकांचा मृत्यू!

Floods in Assam more than 24 lakh people affected many dead

गृहमंत्री अमित शाहांची मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी झाली चर्चा! Floods in Assam more than 24 lakh people affected many dead

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : या दिवसांत मुसळधार पावसामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये मुसळधार पावसानंतर पूर आला आहे. त्यामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे 24 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून मदतीचे आश्वासन दिले.

शाह यांनी लोकांना आश्वासन दिले की राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) युद्धपातळीवर काम करत आहेत. गृहमंत्री शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त राज्याला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले आहे. गृहमंत्र्यांनी लिहिले की, “मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, सध्याची परिस्थिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम युद्धपातळीवर काम करत आहेत आणि पीडितांना मदत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि या आव्हानात्मक काळात राज्याला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

मान्सूनच्या आगमनानंतर उत्तर-पूर्व तसेच आसाममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आसाममध्ये पूर आला आहे. या पुरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक रस्ते बंद झाले असून हजारो एकर पिके नष्ट झाली आहेत. या पुरात पशुधनाचेही नुकसान झाले आहे. पुरामुळे शेकडो लोक बेघर झाले आहेत.

Floods in Assam more than 24 lakh people affected many dead

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात