विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.Farmers will demonstrates on all over country
शेतकरी नेते इंद्रजितसिंग यांनी ही घोषणा करताना २६ जूनला या निदर्शनांसोबतच शेती वाचवा, लोकशाही वाचवा हा दिवसी पाळला जाईल, असे सांगितले. याच दिवशी (२६ जून) १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली होती
आणि शेतकरी आंदोलन देखील याच दिवशी सात महिने पूर्ण करत आहे. या दडपशाहीच्या वातावरणात शेतीसोबतच लोकशाहीवरही हल्ला झाला असून ही अघोषित आणीबाणी आहे, असे टीकास्त्र इंद्रजितसिंग यांनी सोडले.
आंदोलनाची आक्रमकता वाढविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने मागील महिन्यात मोदी सरकारच्या सत्तास्थापना दिनी २६ मेस काळा दिवस पाळला होता. आता आंदोलनाला सात महिने पूर्ण होत असल्याबद्दल २६ जूनला देशभरातील राजभवनावर निदर्शने करून आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
Farmers will demonstrates on all over country
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानात काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- वृद्ध मेले तरी हरकत नव्हती, बालकांचे लसीकरण आधी व्हायला हवे
- ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान
- अमेरिकेत फेडरल जज बनणारे पहिले मुस्लिम बनले जाहिद कुरेशी, सिनेटने दिली मान्यता
- पाकिस्तानकडून संरक्षण बजेटमध्ये वाढ, तब्बल 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद
- G-7 Summit : ब्रिटन आणि फ्रान्सदेखील जगात लसीचे दान करणार, यापूर्वीच अमेरिकेची 50 कोटी डोस दान देण्याची घोषणा