वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी दररोज दीड कोटी डोस देण्याची गरज आहे. तरच, तरच वर्षाअखेर सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञानी व्यक्त केला. Corona Vaccine: 1.50 crore vaccines needed daily in the country, challenge to complete vaccination by 31st December
भारतात प्रौढांची संख्या १०० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे दरमहा जलदगतीने लसीकरण करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर, २०२१ अखेर सर्व प्रौढांना लस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १ जानेवारी २०२२ पासून प्रारंभ होईल.
२३ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत देशात १०० कोटी प्रौढांना लस दिली आहे. यात ७० कोटी लोकांना पहिला डोस लस तर ३० कोटी जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत. १०० कोटी डोसचे लक्ष्य २७९ दिवसांत गाठले आहे. राहिलेल्या १०० कोटी डोस ६९ दिवसांत द्यावे लागतील. हे काम आव्हानात्मक आहे. परंतु, सर्व प्रौढांना किमान पहिला डोस मिळावे, हे सरकारचे लक्ष्य आहे. ७५ टक्के प्रौढा पहिला डोस मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App