महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.Corona test report will have to be given to those coming from Goa, Kerala, Rajasthan, Gujarat, Delhi, Uttarakhand, Maharashtra government has made it mandatory
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाने कहर मांडला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्य सरकारने सहा राज्यांना अति संवेदनशील घोषित केले असून या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्या आधी ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा रिपोर्ट प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना दाखवावा लागणार आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात सध्या ६ लाख ७० हजार ३८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App