कर्नाटकात गृहमंत्री आहे की नाही हे आम्हाला माहित नाही, असंही कुमारस्वामींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : Kumaraswamys केंद्रीयमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.Kumaraswamys
आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना एच.डी. कुमारस्वामी म्हणाले, “माझ्या मते, हे सरकारचे अपयश आहे. मंगळवारपासून क्रिकेट चाहते उत्साहित आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत. सरकारने निमंत्रण दिले आणि आरसीबी संघाने बंगळुरूला येण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकार त्यांचा सत्कार करू इच्छित होते. जर सरकारने योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या असत्या तर ही घटना घडली नसती. हे सरकारचे अपयश आहे.’’
‘’आमचे उपमुख्यमंत्री क्रिकेटपटूंचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले. मुख्यमंत्र्यांनीही ते गांभीर्याने घेतले नाही. कर्नाटकात गृहमंत्री आहे की नाही हे आम्हाला माहित नाही. कायदा आणि सुव्यवस्थेवरून सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्य या दुःखातून सावरावेत अशी मी देवाला प्रार्थना करतो.” असंही कुमारस्वामींनी सांगितलं.
याचबरोबर ते म्हणाले की, बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळील घटना, ज्यामध्ये आरसीबीच्या विजयाच्या उत्सवादरम्यान चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याने सर्वांना धक्का दिला आहे. आनंदोत्सव सुरू होण्यापूर्वीच निष्पापांचे जीव जात आहेत हे पाहणे खूप दुःखद आहे. या दुर्घटनेचे थेट कारण योग्य तयारी आणि खबरदारीच्या उपाययोजनांचा अभाव आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या आपत्तीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांनी सरकारने जखमींना तातडीने चांगले उपचार द्यावेत आणि पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे यावे अशी मागणीही केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App