• Download App
    टोमॅटो स्वस्त करण्यासाठी केंद्राचा पुढाकार; आंध्र- कर्नाटक- महाराष्ट्रातून खरेदी करणार, इतर राज्यांत कमी किमतीत विकणार|Centre's initiative to make tomatoes cheaper; Will buy from Andhra-Karnataka-Maharashtra, sell in other states at low price

    टोमॅटो स्वस्त करण्यासाठी केंद्राचा पुढाकार; आंध्र- कर्नाटक- महाराष्ट्रातून खरेदी करणार, इतर राज्यांत कमी किमतीत विकणार

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशभरात टोमॅटोंच्या वाढत्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने योजना तयार केली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करून भाव जास्त असलेल्या भागात वितरित करण्यास सांगितले आहे.Centre’s initiative to make tomatoes cheaper; Will buy from Andhra-Karnataka-Maharashtra, sell in other states at low price

    देशात बहुतांश ठिकाणी टोमॅटोचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. सरकारने सांगितले की, ज्या केंद्रांना हा ताजा साठा वितरित केला जाईल त्यांची ओळख गेल्या एका महिन्यात किरकोळ किमतीत झालेल्या वाढीच्या आधारावर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत वापराचाही विचार करण्यात आला आहे. म्हणजेच जिथे वापर जास्त असेल तिथे त्याचा पुरवठाही जास्त असेल.



    सरकारने सांगितले की, शुक्रवारपासून म्हणजेच 14 जुलैपासून दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना नवीन स्टॉक उपलब्ध करून दिला जाईल. म्हणजेच शुक्रवारपासून त्यांना कमी दरात टोमॅटो खरेदी करता येणार आहे.

    एकूण उत्पादनात दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रांचा वाटा सुमारे 60%

    टोमॅटोचे उत्पादन जवळपास प्रत्येक भारतीय राज्यात होते. तर देशाच्या एकूण उत्पादनात दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेशांचा वाटा सुमारे 60% आहे. भारतातील इतर भागांमध्ये टमाट्यांच्या सतत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी या प्रदेशातील अतिरिक्त उत्पादनाचा वापर केला जातो.

    पावसाळ्यात टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने भाव वाढतात

    वेगवेगळ्या प्रदेशांतील हंगामानुसार उत्पादनाचे प्रमाण कमी-जास्त राहते. देशातील बहुतांश भागात टोमॅटोचे जास्तीत जास्त उत्पादन डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होते. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये उत्पादन कमी होते. जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्याने उत्पादन घटून भाव वाढतात.

    महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून नवीन पिकांची आवक झाल्याने भाव कमी होतील

    दिल्ली आणि आसपासच्या शहरांना हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधून साठा मिळत असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचा पुरवठा होत आहे. मात्र, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून लवकरच नवीन पीक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भाव कमी होण्याची शक्यता आहे.

    Centre’s initiative to make tomatoes cheaper; Will buy from Andhra-Karnataka-Maharashtra, sell in other states at low price

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका