• Download App
    आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर, मृतांची संख्या 13 वर, ड्रायव्हरने सिग्नल ओव्हरशूट केल्याने दुर्घटना|Cause of train accident in Andhra Pradesh emerges, death toll rises to 13, mishap due to driver overshooting signal

    आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर, मृतांची संख्या 13 वर, ड्रायव्हरने सिग्नल ओव्हरशूट केल्याने दुर्घटना

    वृत्तसंस्था

    विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन गाड्यांची टक्कर झाली. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांची संख्या 13 वर पोहोचली आहे, तर 50 प्रवासी जखमी झाले आहेत. विजयनगरम जिल्ह्यातील अलमांडा-कांकटपल्लीदरम्यान हा अपघात झाला.Cause of train accident in Andhra Pradesh emerges, death toll rises to 13, mishap due to driver overshooting signal

    रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला 08504 विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने मागून धडक दिली. वॉलटेर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले की, अपघातात पाच डबे रुळावरून घसरले. यातील तीन डबे हे पुढील ट्रेनचे होते, तर दोन डबे मागील ट्रेनचे होते.



    ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ विश्वजित साहू यांनी सांगितले की, हा अपघात मानवी चुकांमुळे झाला. पाठीमागून येणाऱ्या विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने सिग्नल ओव्हरशॉट केला, ज्यामुळे टक्कर झाली.

    रेल्वेने आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. पूर्व किनारपट्टी रेल्वेने आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये भुवनेश्वर- 0674-2301625, 2301525, 2303069 आणि वॉल्टेअर डिव्हिजन- 0891- 2885914 यांचा समावेश आहे.

    केंद्र सरकारने 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अधिकार्‍यांना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

    12 गाड्या रद्द, 15 गाड्या वळवल्या वॉल्टेअर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणाले की, बचाव कार्य सुरू आहे, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला मदत आणि रुग्णवाहिकेसाठी सूचित करण्यात आले आहे. अपघात निवारक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याच वेळी, मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मदत कार्यासाठी सर्व व्यवस्था करण्यास सांगितले आहे. रुग्णवाहिका आणि इतर जीवनावश्यक वस्तू घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

     

    Cause of train accident in Andhra Pradesh emerges, death toll rises to 13, mishap due to driver overshooting signal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य