विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे भरमसाठ आकडे वेगवेगळ्या वृत्तवाहिनी दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने सकाळी 11.45 पर्यंत जे कल जाहीर केले, त्यामध्ये भाजप 84, जेडीयू 75, आरजेडी 36, लोक जनशक्ती 23 आणि काँग्रेस 7, कम्युनिस्ट 6 जागांवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले.
वृत्तवाहिन्यांनी स्वतःच्या हवाल्याने वेगळेच आकडे देऊन सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 160 पेक्षा जास्त जागा देऊन टाकल्या. परंतु आता निवडणूक आयोगाने मात्र अधिकृत आकडे जारी करताना बिहारच्या निवडणुकीत फार मोठा उलटफेर झाल्याचे स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने जारी केलेले हे आकडे आता स्थिर होत असून त्यामध्ये आता फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App