वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील जनतेला उत्तम आणि स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवण्याबरोबरच जेनेरिक औषधेही दिली जात आहेत. दरम्यान, सरकारी सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात येत आहे की, केंद्र सरकार 15 ऑगस्ट रोजी गंभीर आजारांवर उपचारात दिल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती कमी करू शकते.Big News: Government’s decision will bring relief to patients, the prices of drugs for serious diseases like cancer-diabetes are likely to decrease.
या औषधांमध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांवरील औषधांचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उपचार घेत असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून काही प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत, मात्र अद्याप या योजनेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकार औषधांच्या वाढत्या किमतीमुळे चिंतेत आहे. त्यांना त्या कमी करायच्या आहेत.
तब्बल 70 टक्क्यांपर्यंत घटतील दर!
सरकारने तयार केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या बहुतांश औषधांच्या किमती तब्बल 70 टक्क्यांनी कमी होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यासह, सरकार आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (NLEM), 2015 देखील अपडेट करू इच्छित आहे, जेणेकरून सध्या वापरल्या जाणार्या औषधांचाही त्यात समावेश होईल.
मात्र, सरकारच्या थेट किंमत नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या औषधांच्या किमती वाढवण्यास फार्मा कंपन्या मोकळ्या आहेत. कंपन्या या औषधांच्या किमती दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App