विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील गैरव्यवहार उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गेल्या तीन वर्षात ईडी आणि केंद्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या कारवाईचा तपशीलही सादर करण्यात आला.Assets worth Rs 881 crore confiscated in three years
ईडीने 250 मालमत्ता जप्त केल्या असून, त्यांचे बाजारमूल्य सुमारे 881 कोटी रुपये आहे. यात भारतातील 677.73 कोटी रुपये आणि विदेशातील 203.27 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे, असे सरकारने लोकसभेत सांगितले.
गेल्या तीन वर्षात एकूण 64 प्रकरणांची चौकशी करण्याचा आदेश एनआयएला देण्यात आला. ही प्रकरणे देशविरोधी कारवाया करण्यात सहभागी असलेल्या दहशतवादी आणि संघटनांविरोधात होती.
यात जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, पंजाब, ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल, झारखंड आणि इतर राज्यांशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत, ज्यांचा तपास सुरू आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये एनआयएने 18, 2019 मध्ये 14, 2020 मध्ये 23 तर 2021 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 9 गुन्हे दाखल केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App