• Download App
    अपघातमुक्तीसाठी आसामचे मुख्यमंत्री स्वत: उतरले रस्त्यावर, वाहनांमधील मद्यपींची केली तपासणी|Assam Chief Minister himself took to the streets to check for drunkenness in vehicles

    अपघातमुक्तीसाठी आसामचे मुख्यमंत्री स्वत: उतरले रस्त्यावर, वाहनांमधील मद्यपींची केली तपासणी

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र करण्यासाठी पोलीसांसह गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरले होते. नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रणासाठी त्यांनी गस्त घातली.Assam Chief Minister himself took to the streets to check for drunkenness in vehicles

    मद्यपान करून वाहन चालवल्याने होणारे मृत्यू होऊ नयेत या मोहिमेचा एक भाग म्हणून वाहनांची तपासणी करताना मुख्यमंत्री वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांमुख्यमंत्री म्हणाले, रात्रभर गुवाहाटीच्या रस्त्यावर होतो. ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र बनवण्याच्या आमच्या आवाहनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आनंदित झालो.



    गुवाहाटीच्या लोकांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल अभिनंदन. आपण २०२२ मधील प्रत्येक दिवस आणि रात्र अपघातमुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवूया.शर्मा यांनी शनिवारी सांगितले की २०२१च्या शेवटच्या दिवशी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियम लागू करण्यासाठी विशेष मोहिमेनंतर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात कोणताही रस्ता अपघात झाला नाही.

    वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले.सरमा यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन वर्षाच्या पहिल्या पूर्वसंध्येपूर्वी दारू पिऊन गाडी चालवण्याविरोधात मोहीम उघडली होती.

    दारू पिऊन वाहन चालवू नका, असे आवाहन त्यांनी केले होते. नवीन वर्ष जवळ येत असताना, सावधगिरीने वाहन चालवून अपघातमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन मी जनतेला करतो असे त्यांनी म्हटले होते.

    Assam Chief Minister himself took to the streets to check for drunkenness in vehicles

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही