All Party Meeting : अफगाणिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालिबानने कब्जा केल्यापासून काबूलसह जवळपास सर्व प्रांतात अराजकाचे वातावरण आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, सर्वपक्षीय बैठकीत 31 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. अफगाणिस्तान मुद्द्यावर केंद्र सरकार आणि सर्व पक्षांचे समान मत होते. या बैठकीत असेही सांगण्यात आले की, अफगाणिस्तानमधून आतापर्यंत किती जणांना भारतात आणण्यात आले आहे. All Party Meeting S Jaishankar GOI has evacuated a total of 565 people from Afghanistan
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अफगाणिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालिबानने कब्जा केल्यापासून काबूलसह जवळपास सर्व प्रांतात अराजकाचे वातावरण आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, सर्वपक्षीय बैठकीत 31 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. अफगाणिस्तान मुद्द्यावर केंद्र सरकार आणि सर्व पक्षांचे समान मत होते. या बैठकीत असेही सांगण्यात आले की, अफगाणिस्तानमधून आतापर्यंत किती जणांना भारतात आणण्यात आले आहे.
सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीची सुरुवात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली. त्यांनी विरोधी पक्षांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. एस. जयशंकर म्हणाले की, आतापर्यंत अफगाणिस्तानातून 565 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ज्यात दूतावासाचे 175 कर्मचारी, 263 इतर भारतीय नागरिक, अफगाणिस्तानचे 112 नागरिक हिंदू आणि शीख आणि 15 इतर देशांचे नागरिक यांचा समावेश आहे. तालिबानबाबत भारत सरकारच्या भूमिकेबद्दल विचारले असता एस. जयशंकर म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारली नाही, ती ठीक होऊ द्या.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या व्यतिरिक्त, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हेदेखील संसद भवनातील दालनात उपस्थित होते. त्याचबरोबर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसीदेखील या बैठकीत सहभागी झाले. याशिवाय तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित राहिले होते.
यादरम्यान परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांनी एक सादरीकरणही केले. ज्यात त्यांनी सांगितले की, आतापर्यंत परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष सेलमध्ये मदतीसाठी 3,014 कॉल आले आहेत आणि त्या सर्वांना उत्तरे देण्यात आली आहेत. त्याच वेळी 7,826 लोकांनी व्हॉट्सअॅपद्वारे आणि 3,102 लोकांशी ईमेलद्वारे संपर्क साधला गेला, ज्याचे उत्तर देण्यात आले आहे.
All Party Meeting S Jaishankar GOI has evacuated a total of 565 people from Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App