Air India : लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी फिरवले; जाणून घ्या कारण?

Air India

मुंबई विमानतळावरून प्रवाशांसह घेतले होते उड्डाण


विशेष प्रतिनिधी

मुंबई – Air India मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान परत बोलावले आहे. फ्लाइटराडार 24 नुसार, एअर इंडियाचे विमान AIC129 आज सकाळी मुंबईहून लंडनच्या दिशेने निघाले होते. परंतु उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान मुंबईला परत बोलावले गेले आहे. असे सांगण्यात येत आहे की इराण व इस्रायलमधील संघर्ष लक्षात घेता, एअर इंडियाने हे विमान परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अनेक विमानांचा मार्गही वळवण्यात आला आहे.Air India

एअर इंडियाच्या मते, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष लक्षात घेता, एअर इंडिया प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या अनेक उड्डाणे वळवत आहे किंवा परत बोलावत आहे.



एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रवाशांना गैरसोयीपासून वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

गुरुवारी अहमदाबादहून लंडनला उड्डाण केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघनानी नगरमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. बोईंग ७८७ ड्रीमलायनर (AI171) एकूण २४२ जणांना घेऊन लंडनला जात होते. हे विमान सुमारे ११ वर्षे जुने होते. या अपघातात विमानातील एक व्यक्ती वाचली तर उर्वरीत २४१ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी, ज्या मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये हे विमान पडले तेथे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे.

Air India flight to London turned back know the reason

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात