‘टीमसीच्या गुंडांनी…’ म्हणत अधीर रंजन चौधरींचा ED अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून ममतांवर निशाणा!

ईडीच्या अधिकाऱ्यांचीही हत्या होऊ शकते, असंही म्हटलं आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे EDच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. या हल्ल्याबाबत भाजप नेते ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. दुसरीकडे, भाजपचा कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसनेही ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी टीएमसीवर उघडपणे हल्लाबोल केला.Adhir Ranjan Chaudhary criticizes Mamata Banerjee over attack on ED officials in West Bengal



पत्रकारांशी बोलताना चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, बंगालमध्ये ईडी अधिकाऱ्यांचीही हत्या होऊ शकते. सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी EDच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे. बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे यावरून दिसून येते. आज ईडीचे अधिकारी जखमी झाले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांचीही हत्या होऊ शकते.

रेशन घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने शुक्रवारी सकाळी कोलकाता आणि त्याच्या लगतच्या जिल्हा उत्तर 24 परगणा येथे एकूण 12 ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. या संदर्भात ते सकाळी 8.30 वाजता उत्तर 24 परगना येथील संदेशखळी येथील तृणमूल नेते आणि ब्लॉक 1 अध्यक्ष शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आले होते.

छाप्यादरम्यानच टीएमसी नेत्याच्या समर्थकांनी हल्ला केला. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेत ईडीचे अनेक अधिकारी जखमी झाले आहेत. अनेक अधिकाऱ्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. कसेबसे ईडीच्या अधिकाऱ्यांनी पळून आपला जीव वाचवला

Adhir Ranjan Chaudhary criticizes Mamata Banerjee over attack on ED officials in West Bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात