कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होती.परंतु नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली होती.Will temples and places of worship be closed further? , Health Minister Rajesh Tope replied ‘yes’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत.करोनाबाधितांमध्ये दररोज मोठी वाढ होऊ लागल्याने नागरिकांसह सरकार आणि आरोग्य यंत्रणांचीही चिंता वाढली आहे.राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होती.परंतु नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली होती.दरम्यान आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं आणखी बंद होतील का? अशी भीती आहे.दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असणारे मंदिर आणि धार्मिक स्थळ आणखी बंद होणार का? याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे.
राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सर्वच धार्मिक स्थळांवर गर्दी टाळावी लागेल. सर्वत्र गर्दी टाळण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.आपआपल्या कडक लॉकडाऊन करायचं नाही.पण,गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App