विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांचे पेंडिंग ई-चलनाची रक्कम भरण्यासाठी अल्टीमेटम जारी केले होते. त्या नंतर 15 दिवसांनी 484,739 वाहन मालकांनी ही रक्कम भरली असून त्या रकमेची एकूण बेरीज 22.77 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर अजूनही ही रक्कम न भरलेल्या चलनांची संख्या 2,100,983 इतकी आहे. 679,676 वाहनांकडून 102.39 कोटी रुपये दंड येणे बाकी आहे.
Violation of traffic rules lead to 22.22 crores of fine collection by maharashtra traffic police
13 सप्टेंबरपासून, महाराष्ट्रभरातील 10 लाखांहून अधिक वाहन मालकांना महाराष्ट्र वाहतूकचे विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी पूर्व-लिटिगेशन नोटीस पाठवली होती. त्यांना ई-चलनाद्वारे आकारण्यात आलेले प्रलंबित दंड मिटवण्याचा किंवा पुढील लोकसभेपुढे उपस्थित राहण्याचा इशारा दिला होता.
रस्ते अपघात टाळण्यासाठी गाड्यांमध्ये सेन्सर्स, चालकाची कामाची वेळही आता निश्चित करणार
एडीजी ट्रॅफिक बीके उपाध्याय म्हणाले, वाहतूक उल्लंघन करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या ज्यांनी एकत्रितपणे वाहतुकीचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारला 417.41 कोटींपेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे. संबंधित लोकांना त्यांच्या रेसिस्टरर्ड मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App