प्रतिनिधी
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना शिवसेनेचे एकमेव स्टार प्रचारक महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले.त्यांनी साखळी काल एक प्रचार सभा घेतली. काही ठिकाणी घरोघर जाऊन शिवसेनेची शिवसेनेचा प्रचार केला आणि आज पत्रकार परिषद घेतली.Three days before the polls, Shiv Sena’s lone star campaigner Aditya Thackeray is in Goa for campaigning; Support from political families
या पत्रकार परिषदेत त्यांनी घराणेशाही संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एखाद्या राजकीय घराण्यातील अनेक व्यक्तींना राजकारणाची आवड असेल तर त्यांनी राजकारणात यायला अडचण काय आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे. राजकीय घराण्यातील व्यक्तींचा जनसंपर्क कसा आहे लोकांशी ते कसे बोलतात कसे वागतात हे पाहायला पाहिजे आणि शेवटी त्यांना निवडून लोकप्रतिनिधी बनवायची की नाही हे जनतेच्या हातात असते असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
साखळी येथे एका बंद सभागृहात घेतलेल्या प्रचार सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले मी गोव्यात प्रचाराला आलो, तेव्हा मला वेगळीच शंका वाटू लागली. महाराष्ट्रातून प्रचारासाठी गोव्याला आलेले सेना नेते हे पुन्हा महाराष्ट्रात परतणार का?, अशी आपल्याला शंका येऊ लागली आहे, धाकधूक वाटत आहे.
जनतेच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना वर्षानुवर्षे नागरिकांचा विश्वास आपल्या कार्यातून जिंकत आली आहे आणि जिंकत राहील. या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जनसेवेसाठी झटणारा शिवसैनिक आपल्यासाठी उभा आहे. pic.twitter.com/VIDb7Pojt4 — Aaditya Thackeray (@AUThackeray) February 11, 2022
जनतेच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना वर्षानुवर्षे नागरिकांचा विश्वास आपल्या कार्यातून जिंकत आली आहे आणि जिंकत राहील. या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जनसेवेसाठी झटणारा शिवसैनिक आपल्यासाठी उभा आहे. pic.twitter.com/VIDb7Pojt4
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 11, 2022
कारण आपले या राज्याशी नाते वेगळे आहे. आपले कुलदैवत या राज्यात आहे, असेही शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याची विशिष्ट ओळख असते. ज्या राज्यात जाऊ तेथील स्थानिक भूमीपूत्रांना न्याय देऊ, तसे स्थानिक गोवेकरांनाही प्राधान्य देऊ, हा सेनेचा गोवेकरांना शब्द आहे, असेही ठाकरे म्हणाले.
भाजपाने गोव्यासाठी काही केले नाही
महाराष्ट्र मॉडेल म्हणून चर्चेत आहे, कारण सलग २ वर्षे उद्धव ठाकरे यांचा देशातील टॉप फाइव्हमध्ये समावेश आहे. गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल आहेत, बंगले आहेत, पण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. मागील १० वर्षे गोव्यात भाजपाची सत्ता आहे, वरती आणि खाली सरकार असूनही गोव्यासाठी काही केले नाही. गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल आहेत, बंगले आहेत, पण पाणी नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App