विशेष प्रतिनिधी
नाशिक : ठाकरे सरकारने कोरोना काळात मंदिरांना टाळे ठोकले आहेत. गेली दीड वर्षे मंदिरात प्रवेश बंदी केली असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियम तोडून नुकतीच पूजा केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांच्यांवर अद्यापि गुन्हा का दाखल झाला नाही?,असा सवाल त्यांनी केला आहे. The spiritual lead of BJP is aggressive : Asked the government to file a crime against Jitendra Avhad for prayer in Temple
या मुद्यावर आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. महाराष्ट्र कायद्याचे राज्य असताना जनता आणि मंत्री यांना स्वतंत्र न्याय कसा ? असा प्रश्न भोसले यांनी विचारला आहे. या प्रश्नी आता पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे. गुन्हा दाखल झाला नाहीतर धरणे आंदोलन करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App