वृत्तसंस्था
नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात एकही विज्ञान विषयक कार्यक्रम आयोजित केलेला नाही. विशेष म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे वैज्ञानिक असूनही आयोजन समितीने एक प्रकारे विज्ञानालाच नारळ दिला आहे. Science program at Sahitya Sammelan are not coundcted ; Doctor Narlikar presidential speech is enough the claim
डॉ. नारळीकर यांचे अध्यक्षीय भाषण पुरेसे आहे. त्यामुळे विज्ञान साहित्यासंबंधी इतर कार्यक्रमाची गरज नसल्याचे साहित्य महामंडळाचे म्हणणे आहे. साहित्य संमेलनात डॉ नारळीकर यांना त्यांची विज्ञान कथा वाचण्याची परवानगीही महामंडळाने नाकारल्याचे वृत्त आहे.
खरे तर विज्ञानावर आधारित कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मात्र साहित्य महामंडळाने नारळीकर अध्यक्ष असल्याने त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विज्ञानाची चर्चा अपेक्षित आहे, असे सांगून विज्ञानावर इतर कोणताही कार्यक्रम आवश्यकता नाही, असे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App