Maharashtra Floods : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूर संकट उभं ठाकलं आहे. राज्यात 10 ठिकाणी दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात मनसैनिकांना पत्र लिहिलं आहे. Raj Thackeray Appeals MNS Party Workers by letter To Help in Maharashtra Floods
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूर संकट उभं ठाकलं आहे. राज्यात 10 ठिकाणी दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात मनसैनिकांना पत्र लिहिलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q — Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत मनसैनिकांनी पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करावी. आता लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढेल. तुम्ही त्यात लक्ष घालून योग्य ती मदत पोहचेल, असं पाहावं. महाराष्ट्रावर मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कोणतीही कुचराई होता कामा नये.” तसंच काम करताना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी पत्राद्वारे मनसैनिकांना केलं आहे.
दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
Raj Thackeray Appeals MNS Party Workers by letter To Help in Maharashtra Floods
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App