वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात उष्णतेची लाट आली आहे. आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ५ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यानुसार, २९ मार्च रोजी बुलढाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे. Heat waves in some districts in five days: Yellow alert issued to 11 districts
हवामान खात्याकडून ३० मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App