मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

वाशिम :मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री केवळ आपल्या मतदार संघापुरते मयार्दीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कुचकामी असल्याची टिका भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.Chief Minister does not come to the ministry, Deputy Chief Minister behaves as if he is only from Pune, alleges Chandrasekhar Bavankule

भाजपा युवा मोर्चाच्या पश्चिम विदभार्तील युवा वॉरियर्सच्या कार्यक्रमाची सुरुवात सिंदखेड राजा येथुन करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफ करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेचा आपल्यालाही आनंद झाला होता,



परंतु पुढील काही महिने वाट पाहिल्यानंतरदेखील वीज बिलाची ही माफी झाली नाही. यावर विचारले असता वीज मंत्री उपमुख्यमंत्री निर्णयावर सह्या करीत नसल्याची दर्पोक्ती राऊत यांनी केली होती. मुळात शेतकºयांना नागरिकांना 100 युनिट वीज माफी मिळायला पाहिजे होती.

ओबीसी किंवा मराठा आरक्षण या सरकारला घ्यायचेच नाही. केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून मोठे काम केले आहे असे सांगून बावनकुळे म्हणाले, मात्र या सरकारला नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याची गरज वाटत नाही, असे सांगून नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याची मागणी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण टिकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एक नंबरवर आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न होतो आहे. पण ग्रामीण भागात विचारा किंवा व्यावसायिकांना विचारा राज्याचे मुख्यमंत्री कोणत्याच नंबरला असणार नाहीत.

Chief Minister does not come to the ministry, Deputy Chief Minister behaves as if he is only from Pune, alleges Chandrasekhar Bavankule

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात