कोरोनामुळे लांबलेल्या राज्यातील विविध महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. नव्या माहितीनुसार, मुंबई व औरंगाबाद वगळता राज्यातील इतर 18 महापालिकांच्या निवडणुका मार्च 2022 मध्ये होतील. राज्य निवडणूक आयोगाने यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. 18 municipal elections to be held in March, discussion on exclusion of Mumbai-Aurangabad
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनामुळे लांबलेल्या राज्यातील विविध महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. नव्या माहितीनुसार, मुंबई व औरंगाबाद वगळता राज्यातील इतर 18 महापालिकांच्या निवडणुका मार्च 2022 मध्ये होतील. राज्य निवडणूक आयोगाने यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महापालिकांना 7 जानेवारीपर्यंत सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चिती, प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच इतर आकडेवारीची माहिती पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. तथापि, या आदेशात औरंगाबाद आणि मुंबई महापालिकांबाबत कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे या दोन महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया लांबल्याची चर्चा सुरू झाली आहे. मार्चमध्ये निवडणुका होणार असतील तर 1 फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, नवी मुंबई, उल्हासनगर, सोलापूर, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे महापालिकेत मार्चमध्ये निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App