• Download App
    Do Not Ignore Maratha Demands: Shahu Chhatrapati Warns Government मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका; शाहू महाराजांचा सरकारला इशारा

    Shahu Chhatrapati : मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका; शाहू महाराजांचा सरकारला इशारा

    Shahu Chhatrapati

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : Shahu Chhatrapati मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार शाहू छत्रपती यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो.Shahu Chhatrapati

    कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत शाहू छत्रपती म्हणाले, “सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत. मराठा समाजाला अनेक वर्षे न्याय मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.”Shahu Chhatrapati

    मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्यानंतर शाहू छत्रपती यांनी त्यांना उघड समर्थन दिले. “जरांगे उन्हात बसले आहेत, तर आम्हीही उन्हात बसू. मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.Shahu Chhatrapati



    यावेळी शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर गॅझेटचा मुद्दाही उपस्थित केला. हैदराबाद गॅझेटप्रमाणेच कोल्हापूर गॅझेटचाही आरक्षण प्रक्रियेत विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. राजर्षी शाहू महाराजांनी देशात सर्वप्रथम आरक्षणाची संकल्पना राबवली होती, मात्र कोल्हापूर संस्थानाशी संबंधित ऐतिहासिक नोंदींकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

    दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे अनेक मागण्या मांडल्या आहेत. सर्व पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणे, सातारा, कोल्हापूर आणि इतर संस्थानांच्या गॅझेटचा विचार करणे, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे, स्वतंत्र मराठा व कुणबी मंत्रालय स्थापन करणे आणि शिंदे समितीला मुदतवाढ देणे या प्रमुख मागण्या आहेत.

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार मराठा समाजाच्या हितासाठी सकारात्मक आहे, मात्र कोणताही निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत आणि कायदेशीर प्रक्रियेनुसारच घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांवर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

    ताज्या घडामोडींमध्ये, सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत पूर्ण होतात, याकडे आता मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

    Do Not Ignore Maratha Demands: Shahu Chhatrapati Warns Government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amol Khune : मनोज जरांगेंच्या मालमत्तेची ‘ईडी’ चौकशी करा; माजी सहकारी अमोल खुने म्हणाले- सध्याचे आंदोलन 900 कोटींच्या टेंडरसाठी!

    Manoj Jarange Patil : 15 तासांनंतर मनोज जरांगेंचे उपोषण मागे; सरकारकडून सर्व प्रमुख मागण्या मान्य, राधाकृष्ण विखे पाटलांची शिष्टाई यशस्वी

    राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई, तर ३३ जणांना बेड्या!!