विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj-Uddhav मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लढतीकडे मोठ्या चाचणीच्या रूपात पाहिले जात आहे. अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याची तयारी केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मनसेने स्वीकृत नगरसेवकपदाबाबत अपेक्षा व्यक्त केली होती; मात्र ती पूर्ण न झाल्यानेच हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे.Raj-Uddhav
मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन स्वीकृत नगरसेवक निवडले गेले. त्यापैकी एक जागा मनसेला द्यावी, अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली होती. ती अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली होती. त्याऐवजी काही प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावर मनसेला संधी देण्याचा पर्याय चर्चेत होता. मात्र आता मनसे तटस्थ राहण्याच्या भूमिकेकडे झुकत असल्याचे संकेत आहेत. या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसू शकतो, तर महायुतीला त्याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Raj-Uddhav
आज मुंबईतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने मतदान होईल. 5 मार्च रोजी सी, डी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण आणि पी दक्षिण या प्रभागांत निवडणूक होणार आहे. 6 मार्चला जी उत्तर, जी दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिण, के पूर्व आणि के पश्चिम या प्रभागांत मतदान होईल. तर 9 मार्च रोजी एल, एम पश्चिम, एम पूर्व, एन, एस आणि टी या प्रभागांत अध्यक्षांची निवड होणार आहे. काही प्रभागांत बिनविरोध निवडीची शक्यताही वर्तवली जात आहे.
सत्तासमीकरणांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 17 पैकी सुमारे नऊ प्रभाग समित्यांवर महायुतीचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित प्रभागांत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सदस्यसंख्या समसमान असल्याने क्रॉस व्होटिंग किंवा एखाद्या पक्षाची तटस्थ भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे मनसेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग समित्या स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था आणि लहान-मोठी विकासकामे यांवर प्राथमिक निर्णय या समित्यांतून घेतले जातात. त्यामुळे अध्यक्षपद मिळवणे म्हणजे त्या भागातील प्रशासनावर प्रभाव निर्माण करणे होय. स्थानिक पातळीवरील सत्तेचे हे केंद्र असल्याने सर्वच पक्ष या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढत मानत आहेत.
मोठी राजकीय चाचणी
महापौर-उपमहापौर निवडीनंतरची ही पहिली मोठी राजकीय चाचणी असल्याने वातावरण अधिकच रंगले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लढतीकडे मिनी जनमत चाचणी म्हणून पाहिले जात आहे. सत्ताधारी आघाडीला आपले संख्याबळ टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे, तर विरोधकांना सत्ता समीकरण बदलण्याची संधी आहे. पुढील तीन दिवसांत मुंबई महापालिकेच्या राजकारणात नवे घडामोडी घडण्याची शक्यता असून, मनसेची तटस्थ भूमिका अंतिम निकालावर किती परिणाम करेल, हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App