• Download App
    PUNE : आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी , जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आदेश। PUNE: Now citizens are banned from entering government offices without prior permission, District Collector Dr. Rajesh Deshmukh has ordered

    PUNE : आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी , जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आदेश

    नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाच्या प्रमुखावर सोपविण्यात आली आहे. PUNE: Now citizens are banned from entering government offices without prior permission, District Collector Dr. Rajesh Deshmukh has ordered


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.यावेळी सरकारी आणि खाजगी कार्यालयासाठी सुद्धा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. असं असलं तरी आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

    जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.नागरिकांना पूर्वपरवानगीशिवाय सरकारी कार्यालयात जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे या आदेशात म्हटले आहे.तसेच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाच्या प्रमुखावर सोपविण्यात आली आहे.



    त्यामुळे इथून पुढे महत्त्वाच्या कामांसाठी सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वी किंवा संबंधित कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी किंवा पूर्व परवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.शहरातील हॉटेल, दुकाने, मॉल तसेच ई-कॉमर्स या ठिकाणी लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास संबंधित दुकाने हॉटेल किंवा कार्यालय सील केले जाणार आहे. अस देखील जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणले.

    PUNE: Now citizens are banned from entering government offices without prior permission, District Collector Dr. Rajesh Deshmukh has ordered

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात मुंबई पालिकेच्या जागावाटपाची चर्चा, भाजपला सुप्त इशारा!!

    निवडणुका जिंकणे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही; ते कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून; प्रकाश आंबेडकरांचा वंचितला मंत्र

    भाजप आणि पवारांच्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका; मतदारांना गृहीत धरल्याचा सुद्धा बसू शकतो फटका!!