विशेष प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवासी दगावले. मात्र या अपघाताबद्दल राजकीय टीका टिपण्या होऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातले मतभेद समोर आले या दोघांनीही रेल्वेच्या प्रशासनाला परस्परविरोधी सूचना केल्या. Pawar-Awhad
ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी एबीपी माझाला माहिती दिली. दरम्यान जखमींवर कळवा आणि मुंब्र्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 10 जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळवा रुग्णालयाने दिली. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सदर अपघात झाल्यानंतर नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल. सध्याच्या लोकल गाड्यांनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. मात्र मध्य रेल्वेच्या या घोषणेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. ऑटोमेटिक दरवाजे नियमित लोकल ट्रेनला शक्य नाही, लोक गुदमरतील, श्वास घेता येणार नाही, असं सांगत मध्य रेल्वेचा हा दावा जितेंद्र आव्हाड यांनी खोडून काढला. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी एक्सवर ट्विट करत वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, असं सांगितलं.
जितेंद्र आव्हाडचे दावे काय?
शरद पवार म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App