अंधेरी विभागातील शेर ए पंजाब नगर येथील बीएमसी मैदान येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या आभार सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोगत मांडताना विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीला भक्कम साथ देण्याचे आवाहन लाडक्या बहिणींना केले.
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या उपयोगातून समतोल विकास साधल्या जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.राज्यातील १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांनी काल मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भेट घेतली. यासंबंधीची बातमी आज मराठी माध्यमांनी फोडली त्यानंतर जयंत वाटलांनी आपण “त्या” कारणासाठी नव्हे, तर “या” कारणासाठी बावनकुळे यांची भेट घेतल्याची कबुली दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीएसआर फॉर चेंज : अॅक्सलरेटिंग शेड्युल्ड ट्राईब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप’ हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9.5 टक्के आदिवासी समुदाय असल्याचे सांगत, त्यांच्या संस्कृतीच्या समृद्धीला अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
राजस्थानमधील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १ मार्च रोजी होणार्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना पोलिसांनी उध्वस्त केला यात दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली असून हॉटेल मालक मात्र फरार झाला.
महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना निर्लज्ज, विश्वासघातकी बाई असे म्हटले.संजय राऊत यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. यावर आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली. या चर्चेदरम्यान, महाराष्ट्र लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल तसेच राज्य शासन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून प्रशासन आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे.
फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा उठवल्यानंतर मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याबरोबर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भाषा झाली “सरळ” आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती पत्करली. पुण्यातल्या कृषी खात्यातल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या नाड्या कशा आवळल्या याचे वर्णन त्यांनी केले.
“पवार संस्कारित” माणसे मुकाटपणे कापताहेत सत्तेच्या सुमडीत कोंबड्या; “ठाकरे संस्कारित” माणसे काढताहेत एकमेकांच्या चड्ड्या!! हे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे आजचे चित्र आहे.
येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार असून दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. रविवारी विधानभवनात आयोजित विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणातले “हलके” आणि “जड” याची चर्चा महायुतीतल्या तथाकथित ताणतणावांमुळे मराठी माध्यमांमध्ये सुरू आहे.
भारताच्या आर्थिक विकासात सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्याच्या माध्यमातून देश 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल, असे केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांनी सांगितले. पुण्यातील जनता सहकारी बँक लिमिटेडच्या हीरक महोत्सव समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
अमरावीतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा आपल्या 15 सेकंद पोलिस हटवा, या वक्तव्यावरून अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हैदराबाद कोर्टाने नवनीत राणा यांना समन्स बजावला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटिस बजावली आहे.
सहकार क्षेत्रात प्रगती करत असताना सहकारी बँकांनी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे देत असताना या दोन्ही नेत्यांनी युद्धाचा ठामपणे इन्कार केला
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. आमच्या एका अभ्यासानुसार ही संख्या वर्षाला ३० ते ३५ लाख रुग्ण हे इतर राज्यातून येतात. याचा परिणाम म्हणजे या रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण संख्येमुळे, इथली व्यवस्था पार कोलमडली आहे आणि त्यामुळे मुंबईतील नागरिकांना उपचार मिळत नाहीत. हे चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा पुरावा म्हणून आधारकार्डावरील पत्त्याच्या आधारे रुग्णांना मुंबईतील सरकारी रुग्णलयात सेवा पुरवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली.
दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्चीत बसविले, त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला, याविषयी मराठी माध्यमांमध्ये सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना टोले हाणले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी प्रथम राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला पाहिजे असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे मत आहे, असे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. माहीम विधानसभेला अमित यांचा पराभव झाला होता. मनसेच्या विधानसभा अध्यक्षांची एक बैठक अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात त्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App