: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा आणि तिच्या मैत्रिणींचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगावमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ज्या औरंगजेबाने काशी विश्वनाथासकट अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंविरोधात जिहाद केला. औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली, त्या औरंगजेबाच्या विरोधात संपूर्ण देशात प्रचंड संताप असताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी मात्र औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली.
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी रविवारी बांगलादेशातील परिस्थितीवर मोठे विधान केले. त्यांनी बांगलादेशातील राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामीवर हल्ला केला. त्या म्हणाल्या की, जमात-ए-इस्लामीने बांगलादेशवर कब्जा केला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे रविवारी परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.
सरकारचे 4 आठवड्यांचे अधिवेशन असणार आहे लवकार आटोपणार नाही. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. मात्र विरोधकांनी भले मोठे पत्र पाठवून चहापानाच्या कार्यक्रमाला त्यांनी बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका जत्रेत शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली.
महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधी पक्षांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी वाढली आहे. सरकारची प्रतिमा धोक्यात आली आहे. त्यामुळे केवळ या घटक पक्षांना सावरून घेण्यापेक्षा खरंतर जालीम उपाय योजनेची गोळी दिली पाहिजे आहे, तरच फडणवीस सरकारची जनमानसातील प्रतिमा टिकून राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमवेत रविवारी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन केले. याप्रसंगी मान्यवरांनी वृक्षारोपण केले व माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील केले.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी अखेर “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.
स्वारगेट एसटी स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याची न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. शनिवारी स्वारगेट पोलिसांनी आरोपी गाडे याचा तब्बल
हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जसा मुस्लीम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशाराही नीतेश राणे यांनी दिला.
काही लोक मला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. परंतु माझ्यासोबत महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ’35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा – 2025′ समारोप समारंभ पार पडला. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष पोलीस संघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-2025’ संपन्न झाली. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डिपार्टमेंटल एन्क्वायरी’ या माहिती पुस्तिकेचे आणि पोलीस नियमावलीच्या दोन खंडांचे प्रकाशन करण्यात आले.
स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दत्तात्रय गाडे या आरोपीच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रेमविवाह करून संसार थाटलेला असूनही, सात वर्षांचा मुलगा असतानाही, आरोपीने समलैंगिक संबंध ठेवून पैसे कमावले असल्याचा खुलासा पोलिस तपासात झाला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे. पुण्यातील घटनेवर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमसारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात जवळपास 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा देखील निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई टेक इंट्राप्रिनियर असोसिएशन’द्वारे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित आशिया खंडातील सर्वात मोठ्या कुत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रदर्शन असलेल्या ‘मुंबई टेक वीक 2025’ कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेतली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील प्रमुख खाणपट्टे सुरू होऊन राज्याला महसूल प्राप्त होणे यासाठी बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ‘पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुकीचे हब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने “आपले सरकार” पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; पण राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट नेमून पवारांनी काढली हवा!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांनी साधलेल्या “पॉलिटिकल टाइमिंग” मुळे आली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व दणका बसल्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय दृष्ट्या कोमात गेली होती. आता ती कोमातून बाहेर आली असून शरद पवारांनी “शॅडो कॅबिनेट” नेमून पक्षाचा विस्तार करायचा निर्णय घेतला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App