पुण्यात काही दिवसांपूर्वी कथित रेव्ह पार्टीवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप चाकणकर यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने भाजपसोबत मिळून निवडणूक चोरल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. महाराष्ट्रात 40 लाख संशयित नावे असल्याचा दावाही त्यांनी केला. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी हरतात तेव्हा आरोप करतात, हा त्यांचा करंटेपणा असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तर राहुल गांधी हे बालिषपणासारखे आरोप करत असून, तो त्यांचा पोरकटपणा असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
महाराष्ट्रात आणि देशात कुठेही मतदानाची चोरी झालेली नाही. तर राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी प्रत्येक वेळी खोटे बोलून पळून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वास्तविक आगामी काळातील निवडणुकीत त्यांना पराजय दिसत आहे. त्यामुळे आधीच कव्हर फायरिंग साठी ते असे आरोप करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
जो कोणी चुकीचं वागेल त्याला मकोका लावू आणि थेट जेलमध्ये घालू. त्यानंतर मग “चक्की पीसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग,” असे सांगत मला वाकड्यात जायला लावू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवित धमकी देण्यात आली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
Municipal Commissioner पुणे महापालिकेमध्ये बुधवारी (ता.६) माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यातला वाद चांगलाच पेटला. किशोर शिंदे यांनी आयुक्तांना मी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर काढेल अशी धमकी दिली तर शिंदे हे गुंडागर्दी करतात मी त्यांना घरात घुसून मारेल अशी संतप्त प्रतिक्रिया आयुक्तांनी त्यावर दिली.
Pune Commissioner पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातुन लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. ज्यात एसी, झुंबर, ॲक्वागार्ड, टीव्ही, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, कॉफी मशिन, फुलांच्या कुंड्या यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. एकूण २० ते ३० लाखांचं सामान चोरीला गेल्याचं सध्या म्हटलं जातंय. मात्र याबाबत कुठलीही तक्रार अजून झालेली नाही.
शरद पवार हे तर भाजपचे हस्तक आहेत मोदींच्या विरोधकांना लकवा मारलाय, त्यामुळे ते मोदींच्या विरोधात लढू शकत नाहीत
पोलिस अधिकाराच्या कानशिलात लगावणं शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते आणि कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना चांगलंच महागात पडलं आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अखेर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावास आणि वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
एकीकडे उबाठा सेनेच्या भास्कर जाधव यांना मंत्रीपदाची घाई झाली, तर दुसरीकडे महाविकास आघाडी बिघाडीची शशिकांत शिंदे यांनी कबुली दिली. त्यामुळे महायुतीतल्या एकाही मंत्र्याची विकेट काढू शकलो नाही, असे शशिकांत शिंदेंना म्हणावे लागेल.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. पूर्वतयारीसाठी बुधवारी सोलापुरात आले होते. दिवसभर मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी, ‘एक घर, एक गाडी’ असा नारा दिला. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजाचा राग असून भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला नको.’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी म्हटले की, जगाला अशा धर्माची आवश्यकता आहे जो हिंदू धर्माप्रमाणे विविधतेला स्वीकारतो.नागपूरमधील धर्म जागरण न्यासच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, धर्म आपल्याला एकतेची भावना बाळगण्यास आणि विविधतेचा स्वीकार करण्यास शिकवतो. आपण विविध आहोत, पण वेगळे नाही. अंतिम सत्य हे आहे की आपण वेगळे दिसू शकतो, परंतु प्रत्यक्षात आपण एक आहोत.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची लिटमस टेस्ट होणार आहे. 20 वर्षानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी फक्त ऐक्याच्या मेळाव्यात भाषणे केली होती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर येथे ‘श्री संत सद्गुरु योगिराज गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह’ येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भगवंताच्या नामस्मरणात रमत फुगडीचा आनंद लुटला.
पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना तयार करतांना भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या निर्णयांमुळे, येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर ११० जागा जिंकण्यासाठी जाळं विणल्याचा आरोप भाजपवर केला जातोय. तसंच यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकलेल्या वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलाचं नाव आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात जोडलं जातंय. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) परळीतून ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यामध्ये वाल्मिक कराडच्या श्रीगणेश आणि सुशील या दोन्ही मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांचीही १७ तास कसून चौकशी केल्याची माहितीही समोर आलीये.
कुठेही कुठलेही आंदोलन दिसले, की रोहित पवार त्यात घुसलेच!!, असे चित्र आज पुन्हा एकदा समोर आले. मुंबईत दादर मधल्या कबूतर खान्यासाठी जैन समाजाने कबूतर खान्यापाशी आंदोलन केले. जैन समाज आणि पोलीस प्रशासन समोरासमोर आले.
महाराष्ट्रातील एक कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. केवळ मुंढेच नाही तर, राज्य सरकारने मंगळवारी एकूण पाच भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!, हे आजच्या दिवसभरातल्या बातम्यांचे सार ठरले.
कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेजच्या बांधकामात आणि प्रस्तावित उंची वाढीतील कथित अनियमिततेची केंद्राने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्नाटकच्या एकतर्फी कृतींमुळे संभाव्य पूर धोका आणि पाणी व्यवस्थापन आव्हाने अधोरेखित केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा येथील नांदणी मठातील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच असे शिवसेनेबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. फुके यांनी माफी मागावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेनं फुके यांना दिला गेला होता. आता राज्यभर आरोप प्रत्यारोपांच्या चौफेर फैरी झाल्यानंतर भाजप नेते परिणय फुके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात 1.25 लाख उद्योजक घडतील आणि 50 हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. तसेच वाढवण बंदर (तवा) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांना गणेशोत्सव, दिवाळी, आणि इतर सणांमध्ये मिळणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेला यंदा ब्रेक लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यामुळे आनंदाचा शिधा पुरवणे यंदा शक्य होणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांच्यावर चक्क चोरीचा आरोप केला आहे. अनुपम खेर यांनी माझा डायलॉग चोरलेला आहे, ते म्हणाले ‘मी पुन्हा येईन’ याचा कॉपीराइट माझ्याकडे आहे, असे मुख्यमंत्री यांनी म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App