संग्राम थोपटे यांना काँग्रेसने दिले तोकडे बळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; त्यामुळे संग्राम थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!
वक्फ कायद्याविरुद्धच्या हिंसक निदर्शनांमध्ये देशभरात मुर्शिदाबाद हिंसाचाराचा मुद्दा जोर धरू लागला आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. या पथकात ९ सदस्य असतील, जे हिंसाचारग्रस्त भागाला भेट देतील आणि त्यांचा अहवाल तयार करतील.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा उसळी घेणार असल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी दीर्घकाळ सक्रिय असलेले मनोज जरांगे आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. जर लवकरच तोडगा निघाला नाही तर राज्यभर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. शिवाय मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या भेटीत जरांगे यांनी हे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रधानमंत्री उषा’ योजनेंतर्गत संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथील ‘बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारती’चे भूमिपूजन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उद्घाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जिथे जमिनीचे संपादन होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर हा जमीन का घेतोय याची माहिती घ्या. कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेची कमाल, नाशकात बाळासाहेब गरजले; उद्धवचे स्क्रिप्ट वाचून भाजपला धुवावे लागले!! उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या नाशिक मधल्या निर्धार मेळाव्यात हे घडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने संपादित जमिनीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹5 लाख सानुग्रह अनुदानाचे प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप करण्यात आले.
ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात देशभरात संताप आहे. बंगालमध्ये हिंदूंवरील हिंसाचारावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे आहे. या करारानुसार, राज्यात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
नाशिक मधल्या काठे गल्ली परिसरातील सातपीर नावाच्या अनधिकृत दर्ग्यावर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून तो दर्गा काढून टाकला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, येथे महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट (SSRDPT) बंगळुरु आणि स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, बंगळुरु यांच्यामध्ये युवकांना नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी काम करणारे लोक हवेत आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असतो असा टाेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांना लगावला.
नाशिकच्या काठी गल्ली परिसरातला अनधिकृत सातपीर दर्गा हटवायला विरोध करणाऱ्या जमावाने ताल मध्यरात्रीनंतर पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली.
या सामंजस्य करारानुसार, विविध जिल्ह्यांमध्ये उद्योजक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली.
येथे एक भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण ट्रक आणि बसमधील भीषण टक्कर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त होत आहे.
एकीकडे उबाठा शिवसेनेला लागलीये गळती; पण त्यांचे प्रवक्ते घालतात भाजपला फुटीची भीती!!, असला प्रकार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुरू केलाय.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून गळती रोखण्यासाठी काय करावे??, या विचारात असणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी अफलातून कल्पनेची आयडिया लढवून उद्या 16 एप्रिल 2025 रोजी नाशिक मध्ये बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray ) आत्तापर्यंत न ऐकलेले भाषण वाजविणार असल्याचा गाजावाजा केला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वदिनी आज नाशिकचा गोदाघाट समता, बंधुता आणि समरसता यांच्या महाआरतीने दुमदुमला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी नव्याने बांधलेल्या संघ भवन आणि भीमराव आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आपण परस्पर मतभेदांमध्ये अडकलो आणि परकीय आक्रमकांनी त्याचा फायदा घेतला
म्हणे, अजितदादांच्या अर्थ खात्यात मुख्यमंत्रीची घुसखोरी; “पोस्टर वरचे मुख्यमंत्री” रोहितदादांनी “पवार बुद्धी” पाजळली!!
काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम पक्षाध्यक्ष करून दाखवावा आणि निवडणुकीचे 50 % तिकिटे मुसलमानांना द्यावीत
चाणक्य फेम अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते काल चैत्र वद्य प्रतिपदेच्या दिवशी रामतीर्थावर गोदावरीची महाआरती करण्यात आली. मनोज जोशी हे त्यांच्या चाणक्य महानाट्याच्या निमित्ताने नाशिक मध्ये आले होते. यावेळी त्यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी महाआरतीचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार करून मनोज जोशी आणि त्यांच्या टीमने रामतीर्थाला भेट दिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App