मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशन व प्रदर्शन’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा ठोस रोडमॅप सादर केला.
आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, असे बोललेलो नाही. पण सध्या आमची परिस्थिती नाही. परिस्थिती बदलल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड येथे एका सभेत बोलताना केला. राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो.
सत्तेच्या वळचणीला यायची जयंत पाटलांची तडफड; त्यांच्याबरोबरच इतर पवार संस्कारितांची देखील तीच तगमग!!, हे चित्र महाराष्ट्रात सध्या समोर येऊन राहिले आहे.
महाराष्ट्रातील नागपूर शहरातील हिंसाचाराच्या सहा दिवसांनंतर रविवारी उर्वरित चार भागांतून संचारबंदी उठवण्यात आली. 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पंचपोली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबारा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
समाजवादी पार्टी आणि मुस्लिम संघटना यांच्याकडून जास्तीत जास्त तुष्टीकरण; हीच भाजपसाठी राजकीय विस्ताराचे भरण पोषण!!, असला प्रकार सध्या देशाचा राजकारणात सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने ४ वर्षे ६ महिने आणि १५ दिवसांनंतर अंतिम क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ज्यामध्ये तपास यंत्रणेने म्हटले आहे की सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis काल रात्रीच आपल्या नियोजित नाशिक दौऱ्यावर दाखल झाले.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याच्या आत्महत्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे
नागपूर येथे झालेल्या हिंसक घटनेबाबत एकूण घटनाक्रम व त्यावर केलेली कारवाई याबाबत शनिवारी विस्तृत आढावा घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातले वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत एकदम कळवळ आला.
१७ मार्च रोजी नागपूर परिसरात झालेल्या दंगलीनंतर सरकारने पंचनामा आणि भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंचनामा अहवालानुसार, दंगलीत एकूण ६२ वाहनांचे नुकसान झाले, ज्यात ३६ कार, २२ दुचाकी, २ क्रेन आणि २ तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय एका घराचेही नुकसान झाले. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामा सुरू करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर नागपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया राबविली.
दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका, अशी विनंती करणारे उद्धव ठाकरेंनी एकदा नव्हे, तर दोनदा फोन केले होते
नागपूर मध्ये दंगल घडवणाऱ्या सगळ्या आरोपींकडून दंग्यातली नुकसान भरपाई वसूल करू. त्यांनी नुकसान भरपाईचे पैसे भरले नाहीत, तर प्रसंगी त्यांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ही सुनावणी आता २ एप्रिल २०२५ रोजी होईल. सतीश सालियन यांनी त्यांच्या वकिलामार्फत ही याचिका दाखल केली होती,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये भेट झाली.
राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचे काम सुरु आहे. मात्र, खासगी आणि देवस्थानच्या जमीनी वक्फ बोर्डाने बळकावल्या असल्याचे आढळून आले तर त्या काढून घेतल्या जातील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची (MSIDC)’ आढावा बैठक पार पडली. एमएसआयडीसी रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी काम करणारी संस्था आहे
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी एक सरकारी निर्णय (GR) जारी केला. आता महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ती जागा (कोठी मीना बाजार) खरेदी करेल, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांनी म्हणजेच औरंगजेबाने ताब्यात घेतले होते. येथे एक संग्रहालय बांधण्याची योजना आहे.
‘कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या केसांवर टिप्पणी करणे किंवा गाणे गाणे हा लैंगिक छळ नाही,’ असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. १८ मार्च रोजीच्या आदेशात न्यायालयाने ही टिप्पणी केली.
आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नागपूर हिंसाचार प्रकरणात प्रवेश केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी तेथील पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले दहा; पण आजोबा कसे आणि किती लढले नातवाने सांगितले पाहा!!, असे आज मुंबईत घडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुदधीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एकत्रित सेवा ॲप (सिंगल विंडो ॲप) आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App