ईश्वरी ऊर्फ मोनाली संतोष भिसे (३७) मृत्यू प्रकरणात वेगवेगळे चार चौकशी अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाले. यामध्ये राज्य सरकारने नेमलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुश्रुत दिलीप घैसास यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. परंतु ससून रुग्णालयाने केलेल्या चौकशीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व डॉ. घैसास यांच्यावर दोष न ठेवता इतर ३ रुग्णालयांवर खापर फोडले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ’22वा मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कार सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत काय दिली आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी लगेच जाहीर भाषणातून प्रतिसाद काय दिला
महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरं तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवण्याची तयारी!! हा असला प्रकार राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आज अचानक सुरू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ’ येथे विविध पुरस्कारांचे वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत छत्रपती संभाजीनगर येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (CMIA) आयोजित, ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
नाशिक मधला बेकायदा सातपीर दर्गा काढून टाकण्याच्या मुद्द्यावरून शहरात मोठी दंगल घडविण्याचे कारस्थान होते पण पोलिसांनी कठोर कारवाई करून ते हाणून पाडले
अत्याचारी आयन रॅंडच्या वधानंतर फाशीवर जाताना चापेकर बंधूंना क्षणभरही पश्चाताप झाला नाही अथवा भिती वाटली नाही. त्यांच्या बलिदानातून देशात क्रांतिकारकांची मोठी फळी उभी राहिली. पण दुर्दैवाने आपल्याला आज बोटावर मोजण्याइतकेच क्रांतिकारक परिचित आहे, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतिकारकांच्या बलिदानाचा मोठा वाटा आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून अपरिचीत अशा साडे बाराहजार क्रांतिकारकांची गाथा देशासमोर येत असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राजकीय शैलीतून इतर सर्व पक्षाच्या नेत्यांची आपल्या मागे कशी राजकीय फरफट केली
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांना लगाम घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे. कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटे यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी काढून स्वतःकडे घेतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग 7अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2) वरील डाऊनलाईन टनलचे ब्रेकथ्रू पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात खंडपीठाने फडणवीस यांना समन्स बजावले आहेत आणि त्यांचा प्रतिसाद मागितला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक संपन्न झाली. यावेळी गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी देण्यासाठी सहमती देण्यात आली. तसेच परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करणे आणि या मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज 1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
संग्राम थोपटे यांना काँग्रेसने दिले तोकडे बळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; त्यामुळे संग्राम थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!
वक्फ कायद्याविरुद्धच्या हिंसक निदर्शनांमध्ये देशभरात मुर्शिदाबाद हिंसाचाराचा मुद्दा जोर धरू लागला आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. या पथकात ९ सदस्य असतील, जे हिंसाचारग्रस्त भागाला भेट देतील आणि त्यांचा अहवाल तयार करतील.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा उसळी घेणार असल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी दीर्घकाळ सक्रिय असलेले मनोज जरांगे आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. जर लवकरच तोडगा निघाला नाही तर राज्यभर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. शिवाय मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या भेटीत जरांगे यांनी हे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रधानमंत्री उषा’ योजनेंतर्गत संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथील ‘बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारती’चे भूमिपूजन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उद्घाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जिथे जमिनीचे संपादन होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर हा जमीन का घेतोय याची माहिती घ्या. कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेची कमाल, नाशकात बाळासाहेब गरजले; उद्धवचे स्क्रिप्ट वाचून भाजपला धुवावे लागले!! उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या नाशिक मधल्या निर्धार मेळाव्यात हे घडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने संपादित जमिनीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹5 लाख सानुग्रह अनुदानाचे प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप करण्यात आले.
ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात देशभरात संताप आहे. बंगालमध्ये हिंदूंवरील हिंसाचारावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे आहे. या करारानुसार, राज्यात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App