• Download App
    रत्नागिरीतील नविद-२ नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशी बेपत्ता, पाच दिवसांपासून संपर्क नाहीNavid-2 boat missing in Ratnagiri, six sailors missing, no contact for five days

    रत्नागिरीतील नविद-२ नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशी बेपत्ता, पाच दिवसांपासून संपर्क नाही

    खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेतNavid-2 boat missing in Ratnagiri, six sailors missing, no contact for five days


    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : रत्नागिरीच्या जयगडमधील मासेमारीसाठी गेलेली नौका समुद्रात बेपत्ता झाली आहे. नविद-२ अस या नौकेच नावं आहे.या नौकेवर तांडेलसह सहा खलाशी आहेत.तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल अशी ६ बेपत्ता खलाशी आहेत. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत.

    दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून या नौकेशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही.त्यामुळे खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेत.

    नेमकी घटना काय घडली

    नविद-२ ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून २६ ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Navid-2 boat missing in Ratnagiri, six sailors missing, no contact for five days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!