वृत्तसंस्था
लातूर : महावितरणच्या कारभाराचा मोठा फटका हा लातूरच्या पाच शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांचा ११ एकर ऊस भस्मसात झाला असून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा येथे आगीची घटना घडली. ५ शेतकऱ्यांचा ११ एकर ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जळाला आहे.
निलंगा तालुक्यातील हलगरा गावातील अनिता गायकवाड याचे ३ एकर, श्रीमंत गायकवाड यांचे २ एकर, झटिंगराव गायकवाड याचे ३ एकर, बालाजी गायकवाड याचे २ एकर तर गोविंद गायकवाड याचे २ एकर ऊस भस्मसात झाला आहे.
महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अगोदच बारा- पंधरा महिने होऊन गेले तरी कारखाना ऊस घेऊन जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असताना ऊस जळाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App