• Download App
    स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं, संजय राऊत यांचा सूचक सल्ला । MP Sanjay Raut Criticizes Congress On Elections on their own Today

    स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं, संजय राऊत यांचा सूचक सल्ला

    स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावे आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार असल्याचंही ते पत्रकारांना म्हणाले. विरोधकांच्या पोटदुखीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिनानिमित्त बोलताना औषध दिलं आहे, ते औषध परिणामकारक ठरेल, अशी आशाही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केली. MP Sanjay Raut Criticizes Congress On Elections on their own Today


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावे आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार असल्याचंही ते पत्रकारांना म्हणाले. विरोधकांच्या पोटदुखीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिनानिमित्त बोलताना औषध दिलं आहे, ते औषध परिणामकारक ठरेल, अशी आशाही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केली.

    संजय राऊत म्हणाले की, कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ हीच शिवसेनेची भूमिका आहे. राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येकानं आपली भूमिका ओळखली पाहिजे, असंही ते म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना संजय राऊत म्हणाले की, “भ्रम राहता कामा नये. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्या पक्षातील एक नेता स्वबळाची भाषा करतो आणि दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे त्या सगळ्यांनी आधी त्या गोंधळातून बाहेर यावं, त्यानंतर स्वबळ वैगरे काय आहे, त्यासंदर्भात निर्णय घ्यावा. पण शिवसेनेविषयी म्हणाल तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल महाराष्ट्रातील जनतेला, लाखो शिवसैनिकांना ही दिशा दिली आहे, त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईस कायम तयार आहे. स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर…”

    दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसकडून सातत्याने स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळातसुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

    MP Sanjay Raut Criticizes Congress On Elections on their own Today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

    Lohagad Murder Case : सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले; कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला

    Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच’ असल्याचा पुनरुच्चार