विशेष प्रतिनिधी
जळगाव –बीड येथील डॉक्टर सुदाम मुंडे यांना अर्भकांच्या हत्येप्रकरणी कठोरातील कठोर शिक्षा झाली असती तर आज व वर्धा जिल्ह्यातील आर्वी सारख्या गावातील घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या व समुपदेशीका ज्योती गुरव यांनी दिली आहे.Dr. Sudam Munde would have been severely punished Then the Arvi incident would not have happened; Social activist Jyoti Gurav claims
वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावांमध्ये डॉक्टर रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता या ठिकाणी पोलीस तपासणीसाठी गेले असता ११ कवट्या व ५४ हाडे पोलिसांना सापडलेली आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे, ही घटना नक्कीच टाळता आली असते जर बीड येथील डॉक्टर सुदाम मुंडे यांना अशाच प्रकरणांमध्ये अटक झालेली असून सुद्धा ही त्यांना अजूनही कठोरातील कठोर शिक्षा झाली नाही
त्यामुळे डॉक्टर असे कृत्य करताना घाबरत नाहीत त्यामुळे डॉक्टर सुदाम मुंडे यांना जर कठोरातील कठोर शिक्षा झाली असती तर आर्वी सारख्या गावातील घटना नक्कीच टळली असती अशी प्रतिक्रिया समुपदेशक ज्योती गुरव यांनी दिली आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App