विशेष प्रतिनिधी
वर्धा – मनमर्जीने विद्यापीठ विधेयक कायदा पारित करून घेतल्याबद्दल त्याचा निषेध म्हणून वर्धा येथील भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरूण पाठक यांच्या नेतृत्वात मुखमंत्र्यांना २० हजार पोस्टकार्ड पाठविली जाणार आहेत.BJP will send 20,000 postcards to the Chief Minister against the University Bill
वर्धा येथील पोस्ट ऑफिस येथून पत्र पाठविण्यात येत आहेत. पवित्र विद्यापीठाना तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवू नका,विद्यापीठ सुधारणा विधेयक त्वरित मागे घावे, अशी मागणी पत्रद्वारे करण्यात आली.
स्वप्नील आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची भाजयुमोची मागणी
आज पासून जिल्ह्यातील सर्व मंडळातून मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात सुरवात केली जाणार आहे. किमान जिल्ह्यातून २० हजार पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांनी सांगितले.
यावेळी भाजयुमोचे कृष्णा जोशी, घनश्याम अहेरी,अतुल देशमुख, अर्जुन जयस्वाल, मयंक खंडागळे, निखिल भेंडे, अमोल मरापे, दिपांशू पेढेकर, मंजू पाल,रवि खंडारे,बादल झामरे,सिद्देश फाये,कुणाल दूरतकर, विवेक कुबडे, विशाल पटेल,भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App