• Download App
    ''राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे, पण आज...'' BJP responded to Sanjay Rauts criticism of the state government

    ”राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे, पण आज…” भाजपाचा पलटवार!

    सगळं आठवून झाले की आजचा रेडा आठवा आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा
    विशेष प्रतिनिधी
    मुंबई : ”महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत.”, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज म्हणाले आहेत. ज्यावर भाजपाने जोरदार पलटवार केला आहे. BJP responded to Sanjay Rauts criticism of the state government
    भाजपाने म्हटले आहे की, ”राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही, हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे.. पण आज तुम्हाला संवेदनाही नाहीत हेही दाखवून दिले.  कधी तुमच्या मालकाला विचारा. त्यांना बीडचा सुमंत रुईकर आठवतो का? तो आठवा!! म्हणजे तुमचे आजचे वाक्य तुमच्याच कानफटात कसे वाजते त्याचा आवाज आठवा. सुमंत आठवला की त्याचा अकाली मृत्यू आठवा, त्याच्या मृत्यूनंतर तुम्ही वाऱ्यावर सोडलेले त्याचे कुटुंब आठवा…त्यांची पत्नी कीर्ती काय म्हणाली तेही आठवा. सगळं आठवून झाले की आजचा रेडा आठवा आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा.”
    गोरेगावात अग्नितांडव! इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू, ५० पेक्षा अधिक जखमी
    याशिवाय ”तुमचे मालक उद्धव ठाकरे यांची मणक्याची शस्त्रक्रिया नीट होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, मी बीड ते तिरूपती पायी चालत दर्शनाला येईन असे साकडे बालाजीला सुमंत रुईकरने घातले होते. उध्दव ठाकरे ठणठणीत झाल्यावर आपले वचन पूर्ण करण्यासाठी बीडहून 1100 किमी पायी निघालेल्या सुमंतचा कर्नाटकात मृत्यू झाला आणि त्यानंतर तुम्ही आणि तुमचे मालक सुमंतला विसरले. त्यांची पत्नी कीर्ती म्हणाली, ज्या ठाकरेंच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी तिच्या नवऱ्याने जीव दिला. त्याच्या मृत्युनंतर दहा दिवसांत ठाकरे कुटुंबातील कोणीही सुमंतच्या परिवाराशी संपर्क केला नाही. त्यानंतरही दीड वर्षे ठाकरे कुटुंबातील कुणीच बोलले नाही, भेटले नाहीत. साधी विचारपूसही केली नाही.. माझ्या नवऱ्याचे बलिदान व्यर्थ गेले..!!!” याचीही भाजपाने आठवण करून दिली आहे.
    याचबरोबर ” लक्षात आले का राऊत रेडा कोण घेवून फिरते? पक्ष नावाचे कुटुंब वाऱ्यावर सोडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी…’ इतकेच तुम्हांला आणि तुमच्या मालकाला ठावूक आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. पूर्वजांचे कर्तुत्व तुम्ही विरसलेच आहात. या पंधरवड्यात त्यांचे स्मरण करा. कशाला यमाचे नाव काढता?” असं म्हणत भाजपाने संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर  दिले आहे.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजूनही “टाळी”, “पावले”, “फोन कॉल” पर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!

    Bawankule’s : सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले

    Fadnavis : फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय; राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द