• Download App
    'वाघाला पाहून नितेश राणेंच्या तोंडातून म्याव- म्याव अस आल असल' ; किशोरी पेडणेकर यांची नितेश राणेंवर टीका'After seeing the tiger, Nitesh Rane's meow-meow came out of his mouth'; Kishori Pednekar criticizes Nitesh Rane

    ‘वाघाला पाहून नितेश राणेंच्या तोंडातून म्याव- म्याव अस आल असल’ ; किशोरी पेडणेकर यांची नितेश राणेंवर टीका

    राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल झाले होताच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला होता.’After seeing the tiger, Nitesh Rane’s meow-meow came out of his mouth’; Kishori Pednekar criticizes Nitesh Rane


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. काल शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल झाले होताच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला होता.दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले.

    भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला यावरुन सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध चालू आहे. आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.नितेश राणेंच्या ‘म्याव म्याव’वर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



    पेडणेकर म्हणाल्या की , ” नितेश राणेंनी जेव्हा म्याव म्यावची प्रतिक्रिया दिली त्यावर आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरुनच त्यांचा सुसंस्कृत आणि असंस्कृतपणा तिथे स्पष्ट दिसला. शिवसेनेला वाघ असंच म्हंटल जात. त्यामुळे आदित्या ठाकरेंना पाहून राणेंना भीती वाटली असेल म्हणून त्यांनी पटकन एक प्रतिक्रिया म्याव म्याव दिली असेल तर माहिती नाही, अशी प्रतिक्रिया देत किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंना सुनावले आहे.

    ‘After seeing the tiger, Nitesh Rane’s meow-meow came out of his mouth’; Kishori Pednekar criticizes Nitesh Rane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना