इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी जगभरातील डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना ढोंगी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, मोदी, ट्रम्प आणि माझ्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या उदयामुळे जगभरातील सर्व डावे नेते चिंतेत आहेत.
अमेरिकेतून आलेल्या भारतीय स्थलांतरितांची चौथी तुकडी रविवारी भारतात पोहोचली. त्यांना अमेरिकेतून पनामाला हद्दपार करण्यात आले. तिथून त्यांना नागरी विमानाने भारतात पाठवण्यात आले.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या तीन दिवसीय ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अजित पवार म्हणाले, चार शतकांपूर्वी मराठा पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या तालकटोरा मैदानाच्या ऐतिहासिक भूमीत हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला, याचा आनंद आहे. मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरेला नवचैतन्य मिळवून देणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रप्रेमींनी मोठ्या संख्येनं लावलेली हजेरी म्हणजे मराठी अस्मितेचा गौरवच आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर पक्षाविरुद्ध बंडखोर वृत्ती दाखवत आहेत. त्यांनी रविवारी सांगितले की मी काँग्रेसमध्ये आहे, पण जर पक्षाला माझी गरज नसेल तर माझ्याकडेही पर्याय आहेत. तथापि, थरूर यांनी पक्ष बदलण्याच्या अफवांचे खंडन केले. ते म्हणाले की, जरी मतभेद असले तरी ते असे मानत नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. यासह, संघाने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 180 धावांनी पराभवाचा बदला घेतला. रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने 241 धावा केल्या. भारताने 42.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजप खासदार, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला
मोदी + पवार गुळपीठावर मराठी साहित्यिकांची आणि संमेलन संयोजकांची तोंडे शिवली, पण त्यांनी शिंदे + गोऱ्हेंवर टीकेची तोफ डागली.
आतिशी यांची दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. रविवारी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अरविंद केजरीवाल, आतिशी सिंह, गोपाल राय हे देखील उपस्थित होते. आम आदमी पक्षाचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.
नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार हे बिहारच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. निशांत कुमार नुकतेच दिल्लीहून परतल्यापासून बिहारमध्ये चर्चा सुरू आहे. सध्या जनता दल-युनायटेड म्हणजेच नितीश कुमार यांचा पक्ष कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या निशांत कुमार यांच्या पोस्टरमुळे बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर मोठे वक्तव्य करताना म्हटले की, “जर पाकिस्तानने विकासात भारताला मागे टाकले नाही, तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.” त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, पाकिस्तान आणि भारतात मोठी चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर पोहोचले. त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबत बालाजी मंदिरात पूजा केली. यानंतर, पंतप्रधानांनी छतरपूरमध्ये बागेश्वर धाम कर्करोग औषध आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केली. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आणि म्हणाले की, आजकाल नेत्यांचा एक गट धर्माची खिल्ली उडवतो.
केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारच्या धोरणांचे कौतुक केल्याने काँग्रेस नेते शशि थरूर आणि पक्षामधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी शनिवारी सोशल मीडिया ‘X’ वर एक पोस्ट करत म्हटले की – “बुद्धिमत्ता कधी कधी मूर्खता ठरते.”
हरियाणामध्ये जर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतो तर सरकार त्याला वयाच्या 50व्या वर्षीच निवृत्त केले जाईल. सरकारने हा नियम लागू केला आहे. त्यानंतर सरकारने महसूल विभागाच्या गट-ब अधिकाऱ्याच्या मुदतवाढीवर बंदी घातली आहे. अधिकाऱ्याच्या सक्तीच्या निवृत्तीचे आदेश लवकरच जारी केले जातील. राज्याचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांनी याची पुष्टी केली आहे.
दिल्लीत दोन्ही बाजूंनी महिला राज्य रेखा गुप्ताविरुद्ध आतिशी सामन्यासाठी विधानसभा सज्ज!!, असे राजकारण दिल्लीत घडले आहे.
शनिवारी सकाळी तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात एसएलबीसी (श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल) बोगदा प्रकल्पाचा एक भाग कोसळला. ज्यामध्ये 6 मजूर अडकले. बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्या आत 14 किमी अंतरावर हा अपघात झाला.
देशभरातील आपल्या अनेक मोठ्या नेत्यांसह सतत जनाधार कमी होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा अडचणी येऊ शकतात. यावेळी काँग्रेस हायकमांडला केरळमधून झटका बसण्याचे संकेत मिळाले आहेत. पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी असे विधान केले आहे की, आता त्यांनी आरपारचा निर्णय घेतला आहे असे दिसते.
झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या बेंचमार्क निर्देशांकात प्रवेश करणार आहेत. येत्या अर्धवार्षिक बदलांमध्ये निफ्टी-50 निर्देशांकात झोमॅटो आणि जिओ फायनान्शियलची ही एंट्री असेल.
ज्यावेळी बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी 1990 च्या दशकामध्ये लिफ्ट लिबरल नेटवर्क तयार केले त्यावेळी त्यांना “मोठ्ठे मुत्सद्दी” म्हणून गौरवले गेले. पण डोनाल्ड ट्रम्प + मोदी आणि मी नुसते बोललो तरी लगेच लोकशाहीला धोका उत्पन्न असल्याचा डांगोरा पिटला जातो.
शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) निव्वळ विक्रेते बनले. त्याच वेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच DII निव्वळ खरेदीदार राहिले. तात्पुरत्या आकडेवारीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी, एफआयआयनी 3,450 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर डीआयआयनी 2,885 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) देशवासीयांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. मन की बातचा हा ११९ वा भाग होता. हा २०२५ या वर्षामधील दुसरा भाग आहे. या आधी पंतप्रधान मोदींनी १९ जानेवारी रोजी देशवासीयांशी मन की बात मधून संवाद साधला होता.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या 42व्या दिवशी भाविकांची गर्दी प्रचंड वाढली असून, वाहतूक व्यवस्थेवर ताण आला आहे. जत्रेच्या बाहेरील भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, यमुना नदीवरील पुलाकडे जाणारा मार्ग तब्बल 7 तासांपासून जाम आहे.
ज्याचे मंत्री, त्याचे निर्णय ही भाजप महायुतीने पॉलिसी स्वीकारली, पण बदनामी मात्र फडणवीस सरकारची होत चालली. असे सध्या दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने शनिवारी ही नियुक्ती केली. समितीचे सचिव मनीष सक्सेना यांनी नियुक्तीबद्दल माहिती दिली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोदी सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. शक्तिकांत दास यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव-२ नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपेल.
दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरे मंजूर केली होती.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App