खेलो इंडिया युवा स्पर्धा पाठोपाठ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतही सर्वसाधारण विजेतेपदकाचा करंडक महाराष्ट्राने पटकविला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून कशा भाजायच्या राजकीय पोळ्या??, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था झाली आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे नामानिराळे; भाजपने स्वतःहून सत्तेच्या वळचणीला घेतलेले अजितदादा देखील फडणवीस सरकार विरुद्ध फिरले, पण narrative setting मध्ये भाजपचे नेते नेहमीप्रमाणे उणे पडले.
राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील याची पाठराखण केली होती. मात्र, आता हिंदी सक्ती नसताना ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक हिंदी भाषेवरून राजकारण केले जात आहे, अशी टीका सामंत यांनी केली आहे.
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना अखेर उपरती झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या टीकात्मक भाषणानंतर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सार्वजनिक समज दिल्यानंतर लोणीकर यांनी स्पष्ट केलं की, “माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांविरोधात बोलणार नाही.”
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यातील सुरू असलेल्या भाषा वादावरून महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने उद्धव आणि राज ठाकरे यांच्या दबावाखाली येऊ नये.
तारीख बदलून मोर्चा हा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??, असा सवाल राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेतून समोर आलाय. राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधातला आवाज बुलंद केल्यानंतर तो विषय महाराष्ट्रात ऐरणीवर आला.
शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये. यात राजकारण आणाल तर याद राखा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले.
माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!! हे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीने सिद्ध केले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांना वयावरुन हिणवत निकालात काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तावरे हे एकटे निवडून आले.
आता अदानी कंपनीचा सीएनजी रिलायन्सच्या इंधन पंपांवर विकला जाईल. रिलायन्स बीपी मोबिलिटी आणि अदानी टोटल गॅसने यासाठी भागीदारी केली आहे. सध्या, अदानीचा सीएनजी काही जिओ पेट्रोल पंपांवर उपलब्ध असेल.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे आणि संघ काही भाजपमध्येच राहून काम करा असे सांगत नाही. त्यामुळे मी संघातही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून समाजसेवा करतो आहे. माझी मते आधीही आणीबाणीच्या विरोधात होती आणि आताही विरोधातच आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
शातील सर्वात मोठ्या संरक्षण कॉरिडॉरची उभारणी नाशिकमध्ये होत आहे. छत्रपती संभाजीनगर त्या कॉरिडॉरचा भाग असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२५ जून) केली. एकेकाळी केवळ धार्मिक आणि कृषी केंद्र म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ‘न्यू मॅग्नेट’ बनणार आहे.
महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. फडणवीस सरकारने वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पहिल्या वर्षी १० टक्के कपात केली जाईल
19500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचे पॅनल जिंकले. चंद्रराव तावरे यांचे पॅनल हरले.
शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या इतिहासात बारामतीकरांनी आतापर्यंत त्यांना कधीच निराश केले नव्हते. “शरद पवार बोले आणि बारामती डोले” अशी स्थिती तब्बल 55 वर्ष कायम होती.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन, २२ जून रोजी एकदशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १७ लाख ६८ हजार किंमतीचा सुवर्ण तुळशीहार अर्पण केला.
अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्या अपमानास्पद पराभवाचे दुःख वाढले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अजून किती काळ हवेत बाण सोडत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या काही विजयी आमदारांच्या मतदारसंघाचे दाखले देत मोठा डाव टाकला
नाशिक मध्ये भरलेल्या डाव्या पक्षांच्या संमेलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी डाव्या पक्षांच्या एका चुकीमुळे भाजपचा विस्तार झाला, असा “जावईशोध” लावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झा
त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!! असे राजकारण शरद पवारांनी खेळले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App